tag:blogger.com,1999:blog-5296424549800847812024-02-09T01:32:25.417+05:30मनाचा आरसाजे जे मनास भावे। ते ते इथे उतरवावे। मन मोकळे करून घ्यावे। अपुले नि:संकोचे||ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.comBlogger32125tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-21812162591160638252021-03-06T09:22:00.001+05:302021-03-06T13:14:29.433+05:30गुरुने दिला ज्ञानरूपी वसा<div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">सामान्य माणसाचं आयुष्यात काय ध्येय असतं? शिक्षणात उत्तम प्रगती, उत्तम नोकरी, खूप नाही पण निदान उच्चमध्यमवर्गात गणना होईल इतकी तरी आर्थिक श्रीमंती, उत्तम पत्नी, उत्तम अपत्ये, त्यांचे उत्तम आरोग्य, शिक्षण, नोकरी वगैरे वगैरे. ध्येय असेल तर आयुष्याला एक दिशा मिळते, जगण्यातली उर्मी टिकून राहाते. जगण्यात एक जिवंतपणा असतो. कालांतराने आपली ध्येयं, कर्तृत्व हीच आपली ओळख बनते.... अर्थात फक्त समाजात! </div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">समाजात असलेली ओळख हीच आपली खरी ओळख आहे असंच आपणही समजू लागतो. आपल्यालाही ती ओळख आवडत असते. इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर, गायक, नोकरदार, कामगार, स्त्री, पुरुष आणि इतर अनेक पदं..... इतकंच काय, मी रामभक्त, मी कृष्णभक्त, मी शिवभक्त, मी स्वामीभक्त, आणि कोणाचे भक्त हेही छाती फुगवून सांगतो. प्रतिष्ठा सगळ्यांना आवडते. समाजात मान मिळत असतो. अहंकार पुष्ट होत असतो. त्यामुळे सगळं आवडत असतं. समाजातलं स्थान, प्रतिष्ठा सांभाळताना, समाजाला आवडणारी आपली प्रतिमा सांभाळताना नकळत या अहंकाराचं ओझं आपण सतत वाहू लागतो. आणि या सगळ्या भानगडीत आपण नक्की कोण आहोत हेच विसरून जातो. ध्येयापर्यंत पोहोचायच्या नादात आयुष्याचा हेतूच जाणून घेत नाही अथवा विसरून जातो.</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">अर्जुनाला कर्मयोग आणि भक्तियोग सांगण्यापूर्वी सांख्ययोग म्हणजे शुद्ध ज्ञानयोग सांगून कृष्णाने त्याला आरसाच दाखवला आहे. 'स्व'रुप समजल्यावर अर्जुन निर्मोही झाला. मोह, व्देष आणि मत्सर यांच्या पलीकडे जाऊन शुद्ध कर्तव्यबुद्धीने युद्ध करु शकला. सावकारीचा धंदा करताना लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणाऱ्या तुकोबांना जेव्हा आत्मदर्शन झालं तेव्हा त्यांचं मनोगत होते;<br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">पावले पावले तुझे आम्हा सर्व</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">नको दुजाभाव होऊ देऊ</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">जेथे देखे तेथे तुझीच पाऊले</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">त्रिभुवन संचले विठ्ठला गा...</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">'स्व'-रुप समजलं, अव्दैत अनुभवलं, तुकोबा वृत्तीने संन्यस्त झाले. </div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">बरं, मी परमात्म्याचा अंश असलेला आत्मा आहे, त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याला काहीही मर्यादा नाहीत, आणि माझ्यासारखेच आजुबाजुचे सगळे जीवही परमात्म्याचाच अंश आहेत. म्हणजे आपण सगळेच एकाच घराच्या निरनिराळ्या खोल्यांसारखे स्वतंत्र, पण एकत्र, एकमेकांशी जोडलेले आहोत. एका खोलीत उठलेली आनंद वा दुःखाची कंपनं सगळ्या घरात पसरतात. कारण आपण जोडलेले आहोत, आपल्यात अद्वैत आहे.. पण, अहम् बह्मास्मि हा अनुभव मी सतत कसा ध्यावा? ध्यानाच्या माध्यमातून समाधीचा अनुभव. म्हणजे २४ तासातली १५-२० मिनिटं आपण ध्यान करू आणि त्यातही चित्त स्थिर होऊन समाधी लागेल २-४ क्षण तेंव्हाच. हे २-४ क्षण केव्हा येतील किंवा कधी येतील तरी का या जन्मी ही स्थिती! 'मी अबक नाही, आत्मा आहे. अबक हे तर मी ग्रहण केलेल्या देहाचं नाव आहे.' हे भान सतत कसं राखावं? कारण माझा तर अगदी लीलया अपमान होतो, जीभेला खुष करणारे पदार्थ मला भरल्यापोटीही खावेसे वाटतात, आणि ते समोर आले की मी पोटापेक्षा जीभेचा विचार करून खातो. कोणाकोणाबद्दलचा राग, व्देष मी वर्षानुवर्ष उराशी बाळगतो. चित्ताच्या वृत्ती सतत उसळत असतात, क्लेश देत असतात. मी अबक नाही, आणि मी या सगळ्याच्या पल्याड अज, नित्य, शाश्वत, पुराण, अचल, अविनाशी, अविकारी आत्मा आहे, याचा मला वारंवार विसर पडतो. त्यामुळे मी सगळ्यांशी जोडलेला असूनही तसं अनुभवू शकत नाही. तेव्हा, मी सांख्ययोग कसा आचरावा, अनुभवावा? </div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">गजानन महाराज अखंड गणी गण गणांत बोते असा जप करत असा पोथीत उल्लेख आहे. त्या जपाचा अर्थ 'सर्व जिवात्म्यांना शिवात्म्यात मोज' असा आहे हे ही पोथी वाचून समजतं. याचा सरळ अर्थ असा होतो, की गजानन महाराज जप करत नसून अखंड अहम् ब्रह्मास्मि अनुभवत होते. दैनंदिन जीवनात मन भरकटवणाऱ्या अनेक प्रसंगात भानावर राहून निःसंगपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. आणि गणी गण गणात बोते हा एक जप करत नसून स्वतःच्या आत्मरूपाची स्वतःला आठवण करून देत होते. अखंड आत्मस्वरूपाचं भान ठेवणं हेच खरं ध्यान आहे आणि त्यामुळे शमलेल्या चित्तवृत्ती हीच समाधी अवस्था आहे. महाराजांचं नामस्मरण करण्याच्या दृष्टीने गणी गण गणांत बोते या मंत्राला काही अर्थ नाही, ती एक आठवण आहे आत्मरूपाची!</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीशी माझी ओळख झाली. ती व्यक्ती गुरुभक्त होती. मग आपल्या घरी गजानन महाराजांची होत असलेली उपासना मीही मोठ्या तोंडाने सांगितली. 'काय उपासना करतोस?' या प्रश्नावर 'पोथीवाचन' याशिवाय आणि काय सांगणार! पण खरंच एवढंच पुरेसं आहे का? पोथीलेखन करून दासगणू महाराजांनी एकप्रकारे गंगातट दाखवला आहे.... 'बघा ही आहे पवित्र गंगा! हीच्या काठावर नुसतं बसायचं, पाण्यात पाय सोडून बसायचं, की पाण्यात डुबकी मारायची हे ज्याचं त्याने ठरवायचं.' आपण जेव्हा स्वतःला महाराजांचे भक्त म्हणवतो तेंव्हा पोथीवाचन हे उत्तम भक्त असण्याचं प्रमाण असतं का? किंबहुना आपणचं आपल्या भक्तीचं प्रमाण द्यावं का? आणि जेव्हा आपण महाराजांना गुरूस्थानी मानतो, तेव्हा आपण भक्ताच्या भूमिकेत असावं की शिष्याच्या? भक्त हा शिष्य असेलंच असं नाही, पण शिष्य हा भक्त नक्की असेल. भक्त हा अनेकदा नकळतपणे मूळ शिकवण न समजता व्यक्तिपूजेत अडकतो. महाराज वैराग्यात बुडालेले होते. पूजा झाली काय, नाही झाली काय; त्यांना सगळं सारखंच. शिवाय एक भूमिका अहंकारयुक्त आहे आणि दुसरी समर्पणाने युक्त. 'शिष्यस्तेहम् शाधि माम् तां प्रपन्नम्' असा अर्जुनाचा समर्पणभाव होता तेंव्हा कृष्णाने गीता सांगितली. आणि समर्पणाशिवाय भक्तीभाव दाटणं शक्य नाही. त्यामुळे निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. <u>वैराग्य</u> - ही आहे महाराजांची खरी शिकवण! <u>स्व-रूप ओळखून</u> प्रारब्धात आलेले चांगले वाईट भोग निःसंगपणे भोगणे, ही आहे महाराजांची खरी शिकवण. आणि 'गणी गण गणांत बोते' हे आहे निःसंगपणे जगण्याचं सूत्र! स्व-रूपाचं भान राहिल्याशिवाय वैराग्य अशक्य आहे. अबकचे प्रश्न अबकचे आहेत. अबकची सुखं अबकची आहेत. मी अबकमध्येही असलो तरी <u>अबक ही माझी ओळख नाही.</u> नित्यः सर्वगतः स्थाणूः अचलोयम् सनातनःI अबक यातला कोणीही नाही, ह्याचं भान राहण्यासाठी अबकला संसार सोडायला नको, की संन्यास आश्रम धारण करायला नको. 'गणी गण गणात बोते'चा अर्थ ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं पुरेसं आहे. गणी गण गणांत बोते ही महाराजांची शिकवण आहे, नामस्मरण नाही. अवघं अध्यात्म सामावलं आहे या एका सूत्रात! यातून येणारी अलिप्तता ही अंतिमतः वैराग्याकडे घेऊन जाणारी असेल. आणि हे वैराग्य निश्क्रियतेकडे झुकलेले न राहता कृष्णाने अर्जूनाला सांगितल्याप्रमाणे 'योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय, <u>सिद्धयसिद्ध्याः समो भुत्वा समत्वं योग उच्यते</u>' असं असेल!</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">स्वयंपाक करायचा आहे, करू - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">लादी पुसायची आहे, पुसू - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, घेऊ - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">मुलांशी खेळायचं आहे, खेळू - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">जेवायचं आहे, जेवू - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">ऑफिसची मीटिंग आहे, अटेण्ड करू - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">लग्नसमारंभाला मिरवायचंय, मिरवू - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">बायकोशी वाद चालू आहेत - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">मयतीला जायचं आहे - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">कोणी टोमणा मारतंय - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">कोणाला टोमणा मारायचाय - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">कोणाबद्दल मनात राग बसलाय - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">कोणाबद्दल द्वेष, मत्सर वाटतोय - गणी गण गणात बोतेहो<br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">कोणाकडे माफी मागायची हिंमत नाही - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">कोणाला माफ करवत नाही - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">आयुष्य संकटांनी भरलयं - गणी गण गणात बोते</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;">.... अतिशय कठीण आहे, पण अशक्य नक्की नाही. इथवर हात धरून आणलंय महाराजांनी, यापुढे तरी हात कसा सोडतील! त्यामुळे, जेव्हा आठवण होईल तेव्हा, जिथे आठवण होईल तिथे, १५-२० मिनिटांच्या ध्यानाशिवाय <u>गणी गण गणात बोते</u>चं 'ध्यान' रोज २४ तास चालू ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं हीच खरी साधना आहे, आणि हीच महाराजांप्रती असलेली भक्ती आहे.</div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><u><b>गणी गण गणात बोते</b></u><br /></div><div style="caret-color: rgb(69, 69, 69); color: #454545; font-family: UICTFontTextStyleBody; font-size: 14px;"><br /></div><p><br class="Apple-interchange-newline" style="-webkit-text-size-adjust: auto;" /></p>ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-89040428045042542332017-10-10T22:43:00.003+05:302021-03-06T09:22:49.775+05:30निरभ्र मन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div dir="auto">
<div dir="auto"><br /></div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
".....
पण अरे, गेली पाच वर्षं माझ्या आयुष्यात अनेक खडतर वळणं समोर आली. काही
माझ्याच निर्णयांमुळे तर काही इतरांच्या. अर्थात त्यांच्या निर्णयाचा
माझ्या आयुष्यावर परिणाम होतोय यालाही अप्रत्यक्षरित्या मीच जबाबदार आहे,
कारण मीच त्यांना माझ्या आयुष्याचा भाग बनू दिलं. साडे-पाच वर्षांपुर्वी
लग्न झालं... हेहे, प्रेमविवाह! अत्यंत सुशिक्षित, सुशील, यशस्वी आहे माझा
नवरा, आणि अभिमान आहे मला त्याचा असं मत होतं माझं. पण actually उंबरा
ओलांडून घरात आले आणि सहा महिन्यात समजलं, जगातला सगळ्यात नाकर्ता पुरुष
कोणी भेटला असेल तर तो हाच!</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
याचा
दिनक्रम सांगायचा म्हणजे कुठुन सुरुवात करायची हा एक मोठा प्रश्नच आहे.
कारण हा झोपतो रात्री अडीच-तीन वाजता. जागून करतो काय, तर दारु पिता पिता
TV पाहणे. एवढी ढोसून झोपल्यावर उगवता सुर्य बघणं सोडाच, कधी माध्यान्हीचं
ऊनही पाहात नाही कारण उठतोच अडीच-तीननंतर. मी या अशा माणसावर नव्हतं केलं
रे प्रेम. हा असा नवरा नको होता मला. मला कर्तृत्ववान नवरा हवा होता आणि
याच्याशी नातं जुळत असताना यानेही तसंच चित्र उभं केलं होतं स्वत:बद्दल.
मीच मूर्ख, मोहाला फसले. याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला कसलीही शहानिशा
केली नाही. कसाबसा दहावी झालाय रे हा. वडिलोपार्जित गडगंजं श्रीमंती आहे,
एकटा मालक आहे सगळ्याचा. पिढ्या नुसतं बसून खातील, म्हणून आपण खरंच नुसतं
बसून खात राहायचं का? आपकमाई काहीच नको का? बापकमाईवरंच आयुष्य घालवणं मला
नाही पटत. मी याला सतत encourage करत राहिले. याच्या घरच्यांचा त्याला
विरोध. समीरला काम करायची गरज नाही, त्याला हवं ते करू दे असा सल्ला मिळाला
त्याच्या घरच्यांकडून. तरीही मी धोशा लावलाच होता, की मला तु किती कमवतोस
हे महत्त्वाचं नाहीये, तु कमवतोएस हे महत्त्वाचं आहे. स्वावलंबन महत्त्वाचं
आहे. पण काही उपयोग झाला नाही. लवकरंच मला दिवस गेले, म्हटलं आता फरक
पडेल, पण नाही. पुढे मुलगी झाली, तरीही बदल शून्य! गंमत म्हणजे
प्रेग्नंसीच्या काळात याने दुसऱ्या एका मुलीसोबत affair केलं, चालू आहे.
ठिके, आम्ही जास्त physical नाही झालो. पण खरंतर जेव्हा मला एका मित्राची
खूप गरज होती तेव्हाही मीच त्याची कायम उत्तम मैत्रिण बनून होते, हर
तऱ्हेने. पण याला त्याचीही पर्वा नव्हती. माझा अनादर मला जाणवू लागला आणि
मी आरोहीला उचलून माहेरी आले. सुरुवातीला काही महिने राहिले तिथे, ते काही
बोलले नाहीत, पण मलाच या वयात त्यांच्यावर भार बनून राहणं रुचेना. एका
शाळेतल्या मैत्रिणीशी योगायोगाने contact झाला आणि चित्रं बदलंल.</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
कॉलेजमध्ये
असताना झुंबा, योगा, पॉवर योगा वगैरे जे जे शिकले त्याचा उपयोग झाला आणि
पहिलं फिटनेस सेंटर उभं राहिलं. पसारा वाढतोय आता. त्यातही अनेक अडथळे आले.
पण घरच्यांच्या आणि friends च्या पाठींब्यामुळे दरवेळी मार्ग निघत गेला.
तुला तर ठाऊक आहेच सगळं", मी.</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"हं,
पुर्वीही तु हे सगळं मोघम बोलली होतीस. करोडोंच्या संपत्तीवर, ऐषोआराम
लाथाडून तू तुझ्या तत्त्वांची कास धरलीस. फार आदर आहे तुझ्याबद्दल. मी कायम
सोबत आहे तुझ्या" ॠतुपर्ण.</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"Thanks
नाही म्हणणार. But yes, I am full of grattitude for you all. माझ्या
पडत्या काळात वेळोवेळी मला सावरलंय, तोल जायचे अनेक प्रसंग आले, दिशाहीन
होण्याचे क्षण आले. तुम्ही सगळ्यांनी माझी गाडी कायम रुळावर राहिल याची
काळजी घेतलीत. फार lucky आहे मी या बाबतीत. Anyway, I am sorry. प्रसंग
काय, मी बोलत्ये काय. छान night at river-shore camp ला आलोय आपण. छान दंगा
घालून झालाय सगळ्यांचा. पांगलेत सगळे आता. शांत आहे सगळं. मिट्ट काळोख
आहे, नदीची संथ खळखळ आहे, ताऱ्यांनी भरगच्च आभाळाखाली आपण छान पहुडलोय. गार
झुळुका येताएत. सगळी सृष्टी प्रसन्नतेची उधळण करत्ये. आणि मी, रडगाणं गात
बसल्ये."</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"शमिका प्लीज,
तुझ्या मनात काहूर माजलं होतं, खुप सारा गाळ साचला होता, तो आता कुठे
सुटतोय आणि म्हणून तू हे सौंदर्य अनुभवत्येस. बरं झालं आपण आत्ता इथे
थांबलोय, तु बोललीस सगळं. नाहीतर बाकीच्यांसारखी तूही हॅहॅहुहु करून गेली
असतीस तंबूत. या camp चा खरा USP तर हा माहौल आहे. जो एवढ्या सगळ्या
लोकांमध्ये फक्त आपण अनुभवतोय."</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"खरंय.
Thanks यार, तु कायम माझा point of view बदलंत आलाएस. तुला सांगते, मी
फिटनेस क्लासेस घेते, students ना सांगते फिटनेसबद्दल, physical, mental
fitness. गंमत म्हणजे मला स्वतःलाच मी mentally fit आहे असं वाटत नाही.
भविष्याबद्दल दाट अंधार आहे. आयुष्याचं गणित चुकलंय, समीकरणं जुळत नाहीयेत,
सगळं planning कोलमडून पडलंय. तीन-साडेतीन वर्षांची मुलगी, संसार
विस्कटलेला, त्यातही सोक्षमोक्ष नाही. समीर घटस्फोटही देत नाही कदाचित मी
अव्वाच्या सव्वा पोटगी मागेन अशी भिती असेल. मी कुठे जाते, काय करते याची
इत्थंभूत माहिती त्याला हवी असते, पण आमच्यासाठी काही धडपड करायची नाहीये.
त्याच्या या निर्णयामुळे मी न तळ्यात न मळ्यात. मध्येच लटकल्यासारखं झालंय.
माझ्या वयाची मुलंमुली बघ, आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे योग्यवेळी येतात
त्यांच्या आयुष्यात. चार लोकांसारखं आयुष्य जगतात. आणि मी! जेमतेम तिशीत
आईपण आणि एकटेपण! काय वाढुन ठेवलंय पुढे? अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य बाकी
आहे, कसं जाणारे ते? जाम टेन्शन येतं रे! हसते, बोलते, काम करते, पण मनात
हे दडपण कायम आहे. कठीण आहे असं आयुष्य जगणं. किती उत्साही होते रे मी! काय
वळणावर आलंय आयुष्य! काय अर्थंय रे अशा आयुष्याला!" माझं बोलणं ऐकून ॠतु
हसायला लागला तो थांबेचना! फारंच विचित्र वाटलं मला, हसतोय की रडतोय, हेच
कळत नव्हतं त्या अंधारात. पण हसतंच होता वेड्यासारखा.</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"बोल ना, का हसतोएस एवढं ॠतु?" काही वेळ गेल्यावर हसणं आवरत अखेर साहेबांनी तोंड उघडलं.</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"बोलायचं
आहेच, पण ते इतकं आहे की त्याची सुरुवात आणि शेवटंच मिळत नाहीये. शोएब
अख्तरचं बरं होत, रन-अप मोट्ठा होता त्याचा. पण सुरू कुठुन करायचं आणि
थांबायचं कुठे हे त्याला नक्की ठाउक होतं. तुझ्या हतबलतेचं उत्तर आहे
माझ्याकडे सुदैवाने, पण आपल्या सनातन धर्मासारखं आदि आणि अंत ठाऊक नसलेलं
आहे."</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"ॠतु बास, बोल आता"</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
"हं...
तर...! आपण सगळेच फार गोंधळलेले आहोत गं, तू एकटीच नाहीस तशी. मगाचपासून
आपण अनेक छोटी छोटी पाखरं, किडे मारले. काही त्या आगीतपण मेली असतील. घरी
झुरळं, पाली, मुंग्या मारतो. असे कित्येक प्राणी, पक्षी, झाडं-झुडपं
जन्माला येतात आणि मरतात. काय असेल त्यांच्या आयुष्याचं प्रयोजन, प्लॅनिंग?
काही नाही... खायचं-प्यायचं, खेळायचं, जोडीदारासोबत ऐश करायची, संख्या
वाढवायची आणि एक दिवस मरायचं, संपलं आयुष्य. आणि आपण माणसं? जसे हे सगळे
सजीव निसर्गाचा हिस्सा आहेत, तसेच आपणही आहोत ना? आपणही एक दिवस जन्माला
येऊन कधी ना कधी मरणारंच आहोत, रादर मरतोच. आपल्या आधी काही पिढ्या गेल्या,
कोण आहे त्यातलं? फार कमी लोकांना त्यांचे पणजोबा, खापर पणजोबा आणि
त्यांचे पूर्वज महिति असतील. बाकी सगळे विस्मृतीतंच गेलेत ना? त्यांनीही
आयुष्यात संपत्तीचा संचय केला असेल, मानमरातब मिळवळा असेल, आय़ुष्याचं
प्लॅनिंग केल असेल, काय झालं त्याचं? कोणाच्या असेल लक्षात? काय होतं
माझ्या खापर पणज्याचं आयुष्याचं ध्येय, स्वप्नं? nobody knows. मगाशी
म्हटलं ते सगळे जीव आणि माणूस, दोघांचंही सगळं सारखंच आहे. मग आपण जन्म आणि
मृत्यु याच्यामध्ये होत असलेल्या देहाच्या स्थित्यंतराला आयुष्य मानून ते
प्लान का करतो? फोल नाही वाटत का सगळं? मानमरातब, पैसा अडका, कुटुंब वगैरे
सगळ्या माणसाच्या कल्पना नाही वाटत का? मरणोत्तर सन्मान, आयुष्याचं गणित,
बालपणात शिक्षण, तारुण्यात लग्न, मग संसार, मुलंबाळं, मग त्यांचं शिक्षण,
तारुण्य, लग्न, नातवंडं.... अरे काय! हे सगळं जो करू शकला नाही तो अयशस्वी
का? आयुष्य वाया? आणि जो हे करू शकला तो यशस्वी? मला वाटतं यश-अपयश,
कीर्ती-अपकीर्ती, मानापमान, हार-जीत वगैरे सगळ्या माणसाच्या आयुष्याला
विनाकारण चिकटवलेल्या संकल्पना आहेत आणि त्या अतिशय क्षुल्लक आहेत. मुळात
एक जीव म्हणून आपण जगलो काय, मेलो काय त्याने जगात कोणाचंच काहीच बदलत
नाही. सगळं सुरळीत चालू राहातं. सृष्टीच्या चक्रात आपण कधी येऊन जातो याने
सृष्टीला काहीच फरक पडत नाही. एवढं परिणामशून्य आपलं आयुष्य आहे, किती
काळाचं? ६०-७०, कधी कधी ९०, अगदी क्वचित १०० वर्षांचं. ती वर्षं म्हणजे तरी
काय तर पृथ्वीचं स्वतःभोवती आणि सुर्याभोवती प्रदक्षिणा घालणं, ज्याला आपण
दिवस-रात्र, आठवडा, वर्ष वगैरे मानतो. म्हणजे ही वेळपण काल्पनिक. किती
तात्पुरतं आहे माणसाचं आयुष्य! तर अशा या तात्पुरत्या आयुष्यात घडलेले
प्रसंग किती तात्पुरते असतील याचा विचार कर. पण आपण त्यांना कवटाळून बसतो,
केंद्रस्थान देऊन. मग आपल्या बुद्धीने निर्माण केलेल्या संकल्पना, कल्पना
किती फुटकळ असल्या पाहिजेत जर आपलं आयुष्यंच इतकं सामान्य असेल तर.
निसर्गाच्या लेखी अनेक जीवाप्रमाणे माणुसपण फक्त एक जीव आहे जो कधीतरी
जन्मतो आणि मरतो. तर या अतिसामान्य संकल्पनांना अतिमहत्त्व देऊन, आपल्या
आयुष्याचा अविभाज्य भाग मानून आपण आपलं आयुष्य क्लीष्ट नाही केलंय का?
नीतीनियम, धर्म, जात, वगैरे सगळ्या संकल्पना काळानुरुप ध्वस्तं होतात,
बदलतात. यातलं काहीच स्थिर नाहिये. आपण खूप जास्त गांभिर्याने बघतोय
आयुष्याकडे. व्यर्थ आहे सगळं, नाही का? तू, मी, आपले नातलंग, इथे जमलेले
लोक, आज ना उद्या आपल्यातलं कोणी नसणारे इथे, गायब असणारेत सगळे. अथक
प्रयत्न करून मिळवलेलं शिक्षण, नोकरी, पैसा, कमावलेलं नाव यांचं जिवंतपणी
जगण्याचं एक साधन याखेरीज अजून काय मोल आहे? लोकांनाही विसर पडेल आपला
पूर्णतः! मग कसलं गणित मांडायचंय? कसला हिशोब चुकतोय? कोणतं समीकरण
जुळवणारेस? चूक-बरोबरच्या संकल्पना.. सगळं वरवरचं आहे. आयुष्य नको घेऊस
एवढं मनावर. कसलाही stress, load नको घेऊस. येणारा प्रत्येक क्षण जग,
अनुभव. येणारं प्रत्येक संकट एन्जॉय कर. कारण त्या संकटात लौकिकार्थाने
कसाही निकाल लागला तरी तो परत काल्पनिक असेल कारण हार-जीत या मानवनिर्मित
संकल्पना आहेत. बस्स, dettach yourself from the results of the
situations, decisions taken by you, incidents, liberate yourself from
this cage of typical thought-process, enjoy every moment. Keep enjoying
every 'this-moment' till the end of this life. जर तू स्वतःला कोणत्या
प्रसंगाशी जोडणार नसशील तर जे घडणार असेल ते चांगलंही नसेल आणि वाईटही नसेल
कारण तु तटस्थ असशील. एवढं सरळ, सोपं आहे आयुष्य. do value it, do respect
it, just give it importance as much as it deserves. are you following
me? am I making sense?" ॠतू.</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
मी
फक्त मान हलवली, होकारार्थी, नकारार्थी, कशीतरी. त्याला तरी कुठे दिसली
असेल अंधारात नेमकी! पण ॠतुने जे काही सांगितलं ते ऐकुन डोकं सुन्न झालं,
एकदम रिकामं झाल्यासारखं वाटलं. आम्ही तसेच पहुडलो होतो त्या वाळुत,
आजुबाजुला सुंदर शांतता होती पहाटेची, हवेत गारवा, नदीच्या संथ लाटांची
खळखळ, निरभ्र आभाळ, चांदण्यांनी भरलेलं, निरभ्र मी, डोक्यात प्रकाश पडलेली.
कमालीचं हलकं वाटत होतं. एखादं भयानक स्वप्न बघत असतो आपण. अचानक जाग येते
आणि समजतं shit, मी स्वप्न बघत होते, जे स्वप्नात घडत होतं ते खरं मानत
होते. आपण परत relax होतो. असंच काहीसं वाटू लागलंय. आयुष्य पण स्वप्नवतंच
वाटू लागलंय, आणि तितपतंच महत्त्वाचं!</div>
<div dir="auto">
<br /></div>
<div dir="auto">
--ओंकार घैसास</div>
</div>
</div>
ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-50215040767738116942014-03-29T01:08:00.003+05:302014-03-29T01:15:00.226+05:30अपूर्णानंद<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आनंद, दु:ख, राग एक ना दोन अनेक प्रकारच्या भावना....<br />
निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या लोकांकडे व्यक्त करून झाल्या आहेत.<br />
पण तुला सांगायचं राहूनंच गेलंय.<br />
खास करून आनंद व्यक्त करायचाय.<br />
तो व्यक्त न होता साठून राहिला तर त्रास होतो.<br />
आम्हाला झालेला आनंद तुला कळायलाच हवा!<br />
तुला तो कळत नाही तोवर तो आनंद पूर्णत्वास कसा जाईल? <br />
तुलाही आमच्या चेहर-यावर आनंदंच बघायचा होता ना?<br />
आहे तो… झळकतोय.<br />
पण तुला त्यात सहभागी होता येत नाहीये याचीच हुरहुर लागली आहे.<br />
आम्हाला झालेला आनंद तुला कळायलाच हवा! दिसायलाच हवा!<br />
माझा विश्वास आहे कि तू अणूरेणूत भिनली आहेस.<br />
हवा, पाणी, झाडं, वेली, फुलं, कोण्या तान्हुल्याच्या आईमध्ये,<br />
गणपतीच्या फोटोमध्ये…. सगळ्यांमध्ये आहेस.<br />
माझ्यामध्येसुद्धा…. ओतप्रोत भरलेली!<br />
संस्काराच्या रूपाने, गाण्याच्या रूपाने, आठवणींच्या रूपाने,<br />
विठ्ठलाच्या नामामध्ये आणि कुठे कुठे… <br />
तू आहेस, तुला सगळं दिसतंय, समजतंय….<br />
पण तू प्रत्यक्ष समोर नाहीस ना;<br />
आमच्या चेहर-यावरचा आनंद पाहून<br />
तुझ्या चेहर-यावर झळकलेला आनंद आम्हाला जोवर दिसत नाही<br />
तोवर आमचा आनंद पूर्णत्वास कसा जाईल?<br />
<br /></div>
ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-28122910837036355842013-09-15T17:21:00.000+05:302013-09-15T17:21:16.293+05:30आध्यात्मिक व्यभिचार<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
गणपतीच्या आकाराचा एक दगड ठेवलाय प्लास्टरचा, आणि त्याच्यापुढ्यात लोकं नतमस्तक होताहेत, काय आश्चर्यकारक चित्र आहे! मंडळाचा कार्यकर्ता स्त्री-पुरुष न पाहता सर्व भक्तांना अंगलट करून बाजूला ढकलण्याचं कार्य करतोय, या वयात वडील पण आपल्या मुलीला असा सहज स्पर्श करत नाहीत!
अरे जागे व्हा.....<br />
<br />
ते मंडळ त्या गणेशाच्या आकाराच्या दगडामुळे नाही प्रसिद्ध झालंय, ते तुमच्यासारख्या अंधश्रद्ध भाबड्यांमुळे प्रसिद्ध झालंय. निर्गुण निराकार असणाऱ्या त्या गणेशाला दगडात शोधायला निघालेत. तुमच्या अंधश्रद्धेला ते आणि तुम्ही श्रद्धा म्हणताय, तुमच्या अंधश्रद्धेवर पोट भरतंय त्या मंडळाचं. आणि मला खात्री आहे तुम्ही मूर्ख, अंधश्रद्ध त्या दगडाच्या पायाशी उभ्या असलेल्या सो कॉल्ड कार्यकर्त्याने तुमच्या बुडावर लाथा घातल्या तरी तुम्ही जागे होणार नाही...<br />
<br />
आणि तिथे १०-१२ आणि २४ तास रांगेत उभे राहून तुम्ही काय तुमची त्याच्यावरची श्रद्धा त्याला सिद्ध करून दाखवताय? अरे झापडं बांधली आहेत तुम्ही तुमच्या डोळ्यावर! गांधारी पण डोळस होती तुमच्याहून. नाकाच्या वरच्या टोकाला जी दोन भोक आहेत ना तुमच्या तिथे फक्त डोळे आहेत, खरं बघण्याची क्षमता नाही किंवा सवय नाही किंवा तुम्हाला खरं बघायचंच नाही.
काम-धंदे टाकून तिथे खुळचट आध्यात्मिक व्यभिचार केल्याने प्रसन्न होणार नाही तो राजा. तुमच्या असल्या वागण्यानी, तुम्ही केलेल्या नवसांनी तुमचं एक कण पण भलं होत नाहीये, पण मंडळ, कार्यकर्ते, राजकारणी आणि समाजातले इतर संधीसाधू यांच्या तुंबड्या अगदी तुडुंब भरल्यात आणि गलेलठ्ठ झाल्याएत. कोणत्याही बुवा आणि बाबांपेक्षा हे वेगळे नाहीत. ध्येय एकच, पद्धत वेगळी. अरे बंद करा हे स्तोम माजवणं. ज्यांची क्षमता नाही त्यांना खांद्यावर, डोक्यावर नका घेऊ. पापाचे धनी व्हाल. तुमचा कान, बुद्धी यांनी भ्रष्टावली आहे. तुम्ही नादी लागला आहात या भोंदूंच्या. एवढ्या प्रचंड प्रमाणात गोळा कशासाठी व्हायचं? तर एका रुबाबदार राजासारखा आकार असलेल्या दगडावर डोकं ठेवायला! किलोकिलोनी सोनं नवसावर वाया घालवायला! अरे एवढी संपत्ती जास्त झालीये तर गरीबांसाठी काही विधायक काम सुरु करा. दगडाला कशाला देताय? अखेर मंडळ त्याचा लीलावंच करणारे.. कधी शहाणे होणार तुम्ही? त्या माजलेल्या कार्यकर्त्यांपेक्षाही त्यांचा माज वाढवण्यासाठी तिथे गर्दी करून प्रोत्साहन देणारे तुम्ही सर्वात जास्त दोषी आहात.<br />
<br />
भा+रत, भक्ती मध्ये रत असलेला समाज... भक्तीचा अर्थ समजून घ्या. प्रज्ञाचक्षू जागे करा.....</div>
ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-22997855963326194762011-07-15T21:05:00.002+05:302011-07-16T12:44:16.319+05:30लिंगभेद होणे अशक्यमी ऑफिसमध्ये बसलो होतो fb वर टाईमपास करत. दुसऱ्या डिपार्टमेंटच्या एका मॅडमनी सांगितलं फोनवर बोलता बोलता, "मुंबईत ३ ठिकाणी बॉम्ब्लास्ट झालेत, दादर, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस..." मोबाईल कानात(स्वतःच्या)खुपसुन मॅडम निघुन गेल्या. थोड्यावेळानी अजुन एक माणुस आला तोही तेच सांगुन गेला. डोळे वगैरे मोठे करुन, म्हणजे डोळे मोठे वगैरे करुन, "ब्लास्ट झालेत तीन" कलटी...... अजुन दोघेजण माझ्या डेस्कवरुन पास झाले. आपसात बोलत होते, "सालं काय मिळतं या भोxxच्यांना common man ला मारुन समजत नाही. आपलं गव्ह...." असं काहीतरी बोलुन बहुदा पुढे सरकारलाही शिव्या घालुन झाल्या. मी लगेच news सुरु केल्या. कुठे सगळ्यात चांगला, ताजा मसाला मिळतोय याचा शोध सुरु...आम्ही तेच करु शकणार उभ्या आयुष्यात! परत शिफ्टमधल्या दुसऱ्या मुलाला फोन पण केला, "काय रे लवकर सोडायचे काही चांसेस?" माझ्यासारखा अतिसामान्य माणुस तरी अशा वेळेला असाच react होऊ शकतो.<br />
<br />
थोड्यावेळाने मित्रांना फोन करायचा प्रयत्न केला, सगळ्या सर्विस प्रोवायडर्सचे सगळे नंबर ‘नोट एवेलेबल’ झाले होते. हरामखोरांनी लॅंडलाईन्स पण बंद केल्या होत्या. हे म्हणजे अतीव बोरिंग होतं. म्हणजे माणुस या असल्या घटनांनतर इतर बडबड फोनवर करुच शकत नाही का? काय वाट्टेल ते समज असतात सरकारचे. बॉम्बस्फोट, ताजसारख्या ठिकाणी दहशतवादी हल्ले, या सगळा घडामोडी अताश्या मुंबईकराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक होत जाणार आहेत. मुंबईकरांना याची सवय नको का व्हायला? फोन लाईन्स बंद करुन ठेवल्यामुळे काहीतर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं ना उगाच. Actually, it was just a bomb blast! जपानी, इंडोनेशियन जनतेला भुकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखींची सवय झाली आहे. हे दहशतवादी लोकं आपल्याला बॉम्बस्फोटांची सवय लावताएत....असो!!!<br />
<br />
आपल्या देशातले तरुण तर असल्या घटना घडल्या कि लईच active होतात. सर्वात पहिल्यांदा ते जर काही करत असतील तर सोशल नेटवर्किंग साईट वर लोगिन करतात. स्वतः काहीतरी हास्यास्पद पोस्ट टाकतात, त्याला कोण कोण `Like' करतंय ते बघतात, मग दुसऱ्यांच्या हास्यास्पद पोस्ट्स ना ‘Like’ करतात, मग त्यावर हास्यास्पद `Comment' टाकतात. एवढाच काय तो धंदा त्यांना शिल्लक राहतो. हे सगळं मी स्वानुभवावरुन सांगतोय बरं का!<br />
<br />
आज सकाळी उशीरा उठुन सर्वात आधी मी टीव्ही सुरु केला. News Channels फिरवुन रिमोटची बॅटरी थोडी संपवुन झाली. प्रत्येक channel वरचे शब्द वेगवेगळे होते. पण सगळ्यांनी बहुदा एकंच पॅरा रेडी करुन ठेवला होता. त्यामुळे सगळीकडे तासभर एकच पॅराग्राफ परत परत वाचला जात आहे असा भास मला झाला. एकाच channel वर मुसळधार पावसात भिवंडी आणि कल्याणची १०० घरं पाण्याखाली गेल्याची बातमी चालु होती. त्यातही एकच पॅरा परत परत वाचुन दाखवत होते. वैतागुन परत वर्तमानपत्र हातात घेतलं. त्यात काही नवीन, वेगळं दिलंय का ते शोधायचा प्रयत्न केला. त्यात कोण काय म्हणाले? हे जरा वाचनीय वाटलं. <br />
<br />
त्या सगळ्यात आपले लाडके, धैर्यशील, कर्तबगार अशा राहुलसाहेब गांधींचे उद्गार समजल्यावर माझ्या अंगात अजुन आग आहे आणि ती तळपायापासून मस्तकापर्यंत वाहते आहे अशी जाणीव मला झाली. तो भडवा म्हणतो,"दहशतवाद आपण रोखुच शकत नाही." या त्याच्या उद्गारावरुन एकुणच राजकारण्यांचा या सगळ्या घडामोडींकडे बघण्याचा काय दृष्टीकोन आहे हे समजलं. त्यांना काय, त्यांच्या बुडाखाली मऊ सीट असलेल्या AC गाड्या असतात. शिवाय सोबत Z किंवा Z+ सुरक्षा. म्हणजे साला जे या पृथ्वीतलावरच काय, अख्या विश्वात एक क्षण पण जगायला लायक नाही, अश्या राजकारण्यांना या स्फोटांमध्ये साधं खरचटत पण नाही शिवाय हे ज्यादा पोलिस दल स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरुन तोंड वर करुन बोलतात!!! यांना सत्तेच्या खुर्च्या हव्यात, त्यावर बसुन प्रचंड पैसा ओरपायला हवाय, जनता कष्ट करुन पैसा कमवते, त्यावरचा टॅक्स हे लोक बायांवर उडवायला वापरतात. अफजल गुरु आणि कसाब सारखे दोशी चैनीत या टॅक्सवर जगत आहेत. लोकं रिटर्न फाईल करतात पण non-taxable amount जनतेला पैसे चारल्याशिवाय परत मिळत नाही. अमेरिकेवर एकदा हल्ला झाल्यावर १० वर्षात तिथे परत अशी घटना घडली नाही. आणि आपल्या इथे वर्षातुन १० वेळा घडतात. असे हे षंढ आपले राजकारणी. साले वोट-बॅंकसाठी गुन्हेगाराल पोसताएत. गिरगाव चौपाटीवर लोकांनी कसाबला झोडपला आहे, हे सर्वश्रुत आहे. तरी हल्ला करणारा कसाब हाच का? याचे पुरावे गोळा केले जाताएत! कहर आहे.<br />
<br />
इथे आम्ही मरमरून कामं करतो, वेळेत कर भरतो आणि त्याचा वापर हे दळभद्री लोक अतिरेक्यांना पोसायला वापरतात, नाहीतर ५ वर्ष खुर्च्या राखुन स्वतःच्या घश्यात घालतात. रस्त्यावरचे खड्डे वर्षानुवर्ष तसेच आहेत. त्यामुळे अनेक अपघात होतात. महागाईनी हद्द पार केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि एकुण इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झालीये. तरी ठिके पेट्रोल, डिझेल हे आपले चोचले आहेत. पण खाद्यपदार्थांच काय? ते तर अखिल मानवजातीचं इंधन आहे. जीवनावश्यक वस्तू आहे ती. माणसाच्या तीन मुलभुत गरजांपैकी १ नंबर गरज आहे अन्न! महिन्याला ५-६ हजार रुपये कमावणारे काय खात असतील? किती खात असतील? त्यांच्या कुटुंबाला पुरत असेल का ते? हवामान बदल किंवा अन्य काही कारणांमुळे जर शेतीवर किंवा तत्सम उत्पादनाचं नुकसान होत असेल तर स्वस्त दरात ते जनतेला उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? कोणत्याही उत्पादनावर कर पण भरायचा परत नुकसान भरपाई म्हणून ज्यादा दरातले खाद्यपदार्थही विकत घ्यायचे? मग इतके कोटी रुपये कर भरणाऱ्या लोकांनी कर भरावाच का? त्याचा जनतेसाठी कुठे आणि कधी वापर होणार?<br />
<br />
१३ जुलै २०११, मुंबईच्या ३ गजबजलेल्या भागांमध्ये गजबजलेल्या वेळेलाच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा साखळी बॉंम्बस्फोट घडवून आणले. काही लोक याचे हकनाक बळी गेले तर काही शे लोक हकनाक जखमी झाले. दर १-१.५ वर्षांनी हि घटना आता मुंबईमध्ये घडु लागली आहे. राहुल्याचे उद्गार वर दिलेले आहेतच. दिग्विजय नावाच्या सिंगानी आज विनोद केला. म्हणे आपली परिस्थिती पाकिस्तानपेक्षा बरी आहे. तिथे आठवड्याला होतात स्फोट. पण अरे मूर्खा तू इथे तशी परिस्थिती यायची वाट बघणारेस का? आणि तुलना कोणाबरोबर करायची याची जाणीव नको का? आम्ही तुझ्या सगळया बँक खात्यांवरची रक्कम देशातल्या सगळ्यात गरीब भिकाऱ्यापेक्षा जास्त राहील असं बघतो, बाकीची काढुन घेऊन आपसात वाटतो. वर आम्ही असं म्हणतो, "समाधान मान कि तो भिकारी तुझ्यापेक्षा गरीब आहे" चालेल का हे त्याला? पाकिस्तानशी तुलना करतोय हिंदुस्तानची!!! लोकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जातोय. मऊ भाग लागतोय तो कोपराने खणला जातोय. कठिण भाग लागतोय त्याला तोडून टाकण्यात येतंय. मानवाधिकार कसाब आणि अतिरेक्यांना लागु होतो, पण त्यांनी मारलेल्या जनतेला लागु होत नाही अजबंच आहे सगळं. <br />
<br />
खरं सांगायचं तर आपण आता लोकशाहीत जगायच्या लायकीचे राहिलेलो नाही असंच वाटु लागलंय मला. किंबहुना आपण ज्याला लोकशाही म्हणतोय ते लोकांनी लोकांचे लोकांसाठी केलेले राज्यंच नाहीये. निवडणुका होतात, उमेद्वारांना राजकीय पक्ष तिकिट देतात. त्या उमेद्वाराची काय लायकी असते लोकांच प्रतिनिधित्व करण्याची? कोणत्यातरी झोपडपट्टीत राहणारा, बाजुच्या मैदानात दिवसभर क्रिकेट खेळणारा, ज्याच्या शिक्षणाचा बालवयातंच बोऱ्या वाजलाय, ज्याच्या पालकांचा आपल्या अपत्यावर ताबा नाही त्यामुळे संस्कार वगैरेंपासुन कोसो दूर राहिलेला असा माणूस निवडणूक लढवतो? त्याची काय पात्रता आहे? नगरसेवक या नावात सगळं आलंय, नगराचा सेवक आहे तो मालक नाही,याचं त्याला भान असायला हवं. ना ज्याला समाजशास्त्राच ज्ञान, ना राजकारणाचं ज्ञान, ना त्याला इथल्या संस्कृतीचं ज्ञान, ना त्याला इथल्या जनतेच्या समस्यांची कदर, असा माणूस आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढवतो? तुमच्या आमच्यासारख्या माणसाने अश्या गयागुजऱ्या माणसांमधुन एखादा उमेद्वार निवडावा? हे म्हणजे वासरात लंगडी गाय शोधण्यासारखं आहे? खरतर परिस्थिती उलटी असायला हवी, सर्व उत्तम उमेद्वारांमधुन सर्वोत्तम उमेद्वार निवडायचा निर्णय आपल्याला द्यायला हवा.यातला एकही उमेद्वार आमचं प्रतिनिधित्व करायला लायक नाही असं मत नोंदवायची संधी आपल्याला मिळायला हवी. ते असेलही कदाचित, निवडणूक समिती आणि राजकारण्यांनी संगन्मतानी दडवून ठेवली असेल ही सोय. आपण निवडणूक समितीलाही काही बोलू शकत नाही, अक्षम्य गुन्हा आहे तो. का कबुल करावं आपण कि ही लोकशाही आहे?<br />
<br />
नेहरू-गांधी कुटुंबीयांनी देशाची पार धुळधाण उडवुन टाकली आहे. ब्रिटिशांनी लुटलं नाही तेवढं यांनी अवघ्या साठ वर्षात लुटलं आहे. ब्रिटीशांनी फक्त धन-दौलत लुटली. स्वकीयांनी स्वाभिमान, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, माणुसकी यासारखी कोणत्याही राष्ट्राला कोणत्याही संकटातुन तारुन नेणारी संपत्ती लुटली आहे. अगदी आर्य चाणक्य आणि पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पेशवे, लोकमान्य टिळक, आगरकर, लाला लाजपत राय, बिपिनचंद्र पाल, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंह आणि त्यांचे साथीदार, सुभाषचंद्र बोस आणि त्यांची सेना, स्वामी विवेकानंद आणि इतिहासाला माहिती नसतील अश्या अनेक स्वातंत्रसेनानींकडे ही संपत्ती होती. तेव्हाच्या देशद्रोह्यांनी किंवा शत्रुंनी आर्थिक संपत्ती वारेमाप लुटली असेल कदाचित, पण तेव्हाच्या भारतीय जनतेची स्वाभिमान, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, माणुसकी, स्वराष्ट्राबद्दलचं प्रेम वगैरे वगैरे सारखी संपत्ती नाही लुटू शकले. म्हणून हिंदुस्थान एवढे वर्ष तग धरून उभा आहे. पण गेल्या साठ वर्षात गांधी-नेहरू कुटुंबाला जे रान मोकळं मिळालंय त्यांनी पार आपला बोऱ्याच वाजवलाय.<br />
<br />
आपण जनताही या सगळ्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहोत. आपण कधीच सामुहीक बहिष्कार नाही घातला. उभं बॉलिवुड अंडरवल्डच्या पैश्यावर आपलं मनोरंजन करतंय हे अनेकदा सिद्ध झालंय आणि आपणा सर्वांना ते ठाऊक असूनही आपण सर्व सिनेमे बघतो. ज्या माणसाला या देशाची फिकीर नाही त्या माणसाचे पैसे ज्या सिनेमाला लागले आहेत तो सिनेमा आपण का बघावा? आणि का त्याला दुप्पट पैसा कमवू द्यावा? इथल्या कित्येक कलाकारांवर देशद्रोहाचा आरोप झालाय. आधी देशाचा नागरिक मग कलाकार. आपण अश्या कलाकारांना डोक्यावर घेतो. कोणताही माणूस कितीही मोठा कलाकार, व्यावसायिक किंवा आणि कोणी असेल तो देशापेक्षा मोठा नाही. याची आपल्याला जाणीव असायला हवी. पाकिस्थानी गायक असतील चांगले गात कोण नाकारतंय पण त्यांनी त्यांची कला तिथे सादर करावी आणि नाव कमवावं. इमान पाकिस्तानशी राखायचा आणि पोट भारतात भरायचं, ही कोणती तऱ्हा? आपण या कलाकारांवर बहिष्कार टाकायला हवा. स्वदेशीच्या बाबतीत आपण आग्रही नसतो. स्वदेशी हे ब्रिटिशांविरोधी प्रभावी शस्त्र होतं हा इतिहास आपण विसरतोय. इथली प्रोडक्ट्स निकृष्ट दर्जाची असतात असा आपण ओरड करतो, पण MADE IN CHINA वाली प्रोडक्ट्स तरी अप्रतिम असतात का? पण त्यांनी इथलंच काय जगातला बाजार ताब्यात घेतला आहे.<br />
<br />
असो, सगळं सुन्नं करणारं आहे. इथे सुधारण्यासारखं खुप आहे. आपापल्या ऑफिसात Team Lead बनण्यासाठी राजकारण करणारे हुशार लोक चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणुन, देशात सुधारणा व्हावी म्हणून समाजाच्या काही भागाचं नेतृत्व मिळवण्यासाठी का नाही असे तडफडंत? सगळा जोशंच गेलाय समाजातला. आता या घडीला मी देशातल्या पुरूष, स्त्रीया आणि तृतीय पंथी यांच्यात भेदच करू शकत नाहीये. मला सगळे हिजडेच दिसताएत. इथे तृतीय पंथीयांच्या नैसर्गिक व्यंगाची खिल्ली उडवण्याचा हेतु नाहीये. पण आपण चीनच्या मागोमाग इतर कोणत्याही बाबती प्रगती करत नसलो तरी लोकसंख्या वाढीच्या बाबतीत मात्र आपण चीनच्या पावलावर पाऊल ठेवतोय. किंबहुना आपलं पाऊल त्यांच्याहुन वेगाने चाललंय. पण बॉस २-४ पोरं काढून बाप झाल्याने कोणाची मर्दान्गी सिद्ध होत नाही ना!!ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-8148200683777261402010-09-01T11:35:00.041+05:302011-11-06T15:32:20.275+05:30मंतरलेले दिवस<a href="http://www.reverbnation.com/tunepak/3478893"></a><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br />
</div> मी स्टुडिओत पाऊल ठेवलं. कंठसंगीताच्या रेकॉर्डिंगचा पहिलाच दिवस होता. जो गायक समोर येऊन गाणार होता, ज्याच्या आवाजात माझ्या अल्बमचं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं, त्या गायकाने जवळजवळ गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलं होतं. आणि असा गायक आपलं गाणं गातोय, यासारखी अभिमानास्पद गोष्ट कोणती असली तरी या गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही.<br />
<br />
२००१ साली आईवर कविता सुचली, बरोबर चालही सुचली. आईच्या घराण्यातंच संगीत. तिथुनंच संगीत आमच्यात उतरलं. मामानी ती कविता आणि चाल ऐकली. आणि त्याच्या पुढच्या भेटीत मला मंगेश पाडगांवकरांचं जिप्सी भेट म्हणुन मिळालं. तेव्हा पहिल्यांदा कविता समजू लागली, कवितेबद्दल आवड निर्माण होऊ लागली. संगीतकार जसा स्वरज्ञान घेऊनच जन्माला येतो, तशी कविताही सूर घेऊनच जन्माला येते. संगीतकार आणि कवितेचे सूर जुळले, संगीतकाराला कवितेचा सूर समजला, भिडला, की ते सूर तो लोकांना ऐकवतो. आणि कवितेचं गाण्यात रुपांतर होतं. कवितेला जबरदस्ती सुरात बांधलं, कि तेच सूर साखळदंडासारखे नकोसे वाटतात. विहीर खोदून मिळवलेलं पाणी आणि दगडाला पाझर फुटून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी, यांच्या गोडव्यात जो फरक असतो, तोच फरक बांधलेल्या चालीत आणि सुचलेल्या चालीत असतो. त्या बांधकामात झालेली ओढाताण आपल्याला जाणवते. सुचलेल्या चालीत नाजुक, विणलेलं नक्षीकाम अनुभवायला मिळतं. हे जेव्हा समजलं, तेव्हापासून चाल सुचायची वाट पाहु लागलो. देवाच्या कृपेने छान कविता समोर येत गेल्या आणि त्यातल्या चाली मला दिसू लागल्या, सुचू लागल्या.<br />
<br />
माझ्या अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी वेगवेगळ्या प्रसंगी माझी गाणी ऐकली. २००९ साली माझ्या गाण्यांचा एक कार्यक्रम कट्टेकर मित्रांनी ठेवला. त्याला फार छान प्रतिसाद मिळाला. आपल्या चाली लोकांना आवडू शकतात याची जाणीव मला तेव्हा झाली. आणि हीच गाणी आपण लोकांसमोर आणायची असा निर्णय मी घेतला.<br />
<br />
घर बांधणं जसं एक काम आहे, तसंच घर आतुन सजवणं ही देखील एक कला आहे. घर बांधणारा माणूस हा उत्तम interior decorator असतोच असं नाही. त्यासाठी वेगळ्या, त्यात माहीर असलेल्या माणसाची आपण मदत घेतो. पाटावरच्या गणपतीएवढंच महत्त्व मखरालाही आहे. गाण्य़ाची चाल म्हणज गणपती-आत्मा-गाभा. गाण्यात वाजणारं वाद्यवृंद, दोन कडव्यांमधलं म्युझिक म्हणजे मखर. चालीएवढंच त्या सजावटीलाही महत्त्व आहे. संगीत-संयोजक म्हणजे गाण्याचा मेक-अप मॅन. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी मला आनंद सहस्रबुद्धेसारखा योग्य आणि कोणी माणुस मिळाला नाही. श्री. अनिल मोहिले यांच्या हाताखाली शिकून आणि गेली ६-८ वर्ष संगीतक्षेत्रात राहुन तो ताराही आता लखलखू लागलाय. संगीत-संयोजनाशिवाय, एक मित्र म्हणून त्याने अनेक बाबतीत मला मदत केलीये, आणि त्याची एक मोठी यादी आहे.<br />
<br />
अनेक चर्चांमधून कोणतं गाणं कसं करावं? त्यात कोणती वाद्य वापरायची? गाण्याचा साधारण आवाज कसा असेल? गाणं कसं ऐकु येणं अपेक्षित आहे? गाणं कोण कोण गाणार? त्यांच्या पट्ट्या काय? गाण्याची लय काय? या बाबी नक्की करण्यात आल्या.<br />
<br />
पार्ल्यातल्या एका छोट्याश्या खोलीत आनंद, अभिजित सावंत(हा तबलजी Indian Idol चा विजेता नाही), अनिल करंजावकर आणि मी तालवाद्याच्या संयोजनासाठी भेटलो होतो. अनिल करंजावकरांचा मिश्किलपणा सुरु होता. माणुस ३०च्या आसपास असेल असा माझा अंदाज होता. नंतर समजलं कि संगीतसाधना करून माणुस १०-१५ वर्ष तरुण सहज राहु शकतो. धुमाळचे बोल ते "श्रीराम जय राम जय जय राम" असे बोलतात तर दादऱ्याचे "ह्याला पाडलं, त्याला पाडलं" असं म्हणतात. आनंद त्यांना एकेक गाणं वाजवुन दाखवे, M0, M1,M2, Fillers वगैरे वाजवुन दाखवे. कुठे कोणता ताल वापरावा? कसा पॅटर्न असावा? पखवाज कुठे असाव?, ढोलक कुठे असावं? इतर तालवाद्य कुठे असावीत? डफ कुठे असावा? टिंपनी कुठे असावी? मादल कसा वाजावा...वगैरे गोष्टींवर चर्चा करून सात तासात ती मैफल संपली. माझे स्टुडिओचे ७ तास वाचले. दोन दिवस हे तालवाद्यांचं सत्र चाललं.<br />
<br />
त्यानंतर विजुजी आले. १० च्या ऐवजी ११ वाजले यायला. बाहेरगावहुन आल्याचा थकवा चेहऱ्यावर दिसत होता, अंगात थोडा ताप आहे असंही ते म्हणाले ते. पण हातात बासरी घेतल्यावर कानाला जे सुख मिळालंय ते अवर्णनीय! प्रत्येक पीसमध्ये एवढा भाव भरलेला होता! परत आखडूपणा न करता स्वतः अजुन सुधारणा करीत होते. "higher octave मध्ये वाजवुन बघतो", "lower octave घे याचा", "याचा सेकंड पण घेतो lower मध्ये" असं म्हणून जे काही द्यायचे.......प्रत्येक प्रयत्न आधीच्या प्रयत्नापेक्षा सरस आणि त्यांना जे सुचत होतं ते आधीच्या प्रत्येक पायरीपेक्षा वरचढ. दिल खुश हुआ........<br />
<br />
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता परत रेकॉर्डिंग सुरु होणार होतं. मी पावणे दहालाच हजर होतो.१० ला ५ कमी असताना स्टुडिओच्या गेटपाशी एक रिक्षा थांबली. त्यातुन साठीच्या आसपास वय असलेले एक काका उतरले. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. त्यांनी रिक्षातुन एक उभ्या आकाराची बॅग काढली. आणि ते होते उमाशंकर शुक्ला. ती सतार पाहिल्यानंतर मला आठवलं, की गुलाम अलीसाहेबांच्या एका लाईव्ह शो ला मी गेलो होतो, तेव्हा बाजुला जे सतारवादक होते ते सतारवादक माझ्या गाण्यांसाठी सतार वाजवणार आहेत. आणि मी किती नशीबवान आहे याची जाणीव झाली मला.<br />
<br />
संतुरवादन ही तर काही गाण्यांची गरज होती. त्याशिवाय गाणं पूर्णच झालं नसतं. आनंद म्हणाला आपण उल्हासजींना विचारु. त्यांचं मानधन आपल्या बजेटमध्ये बसणार असेल तर उत्तम. कारण VST किंवा साउंडफॉंट वापरुन वाजवलेल्या संतुरमध्ये मजा नाही. उल्हासजींना फोन लावला, त्यांचं मानधन आम्हाला झेपणार नव्हतं. त्यामुळे आम्ही मनाची तयारी करुन तो नाद सोडला होता. कारण सर्विस घ्यायची तर त्याचा मोबदला पण तेवढा गेला पाहिजे असं आमचं मत होतं. पण आधी नाही सांगुन त्यानंतर स्वतःहुन उल्हासजींचा फोन आला. "तुमच्याबरोबर मी कधीच काम केलेलं नाहीये, त्यामुळे मी वाजवीन संतुर". अगदी एस. डि. बर्मन, पंचमदांच्या काळापासुन म्हणजे कमीत कमी गेली ४० वर्षे जी व्यक्ती संतुर वाजवत्ये, आणि एवढ्या मोठ्या संगीतकारांसाठी ज्यांनी काम केलंय ते संतुरवादक ४ गाण्यांसाठी संतुर वाजवुन गेले. एकामागुन एक असे पिसेस देत होते. स्टुडिओ प्रसन्नतेने भारुन गेला होता. श्रावणातला वारा सुटावा, सगळीकडे हिरवंगार, प्रसन्न दिसावं असं काहीसं वाटत होतं. संतुरचा नाद कानात भिनत होता रात्री झोपल्यावर पण! उल्हास बापट दि ग्रेट!!!<br />
<br />
ज्ञानेशदादांचं स्पॅनिश गिटार आणि ट्वेलस्ट्रिंग लाजवाब होतं. ज्ञानेसदादांना फक्त गाण्याची पट्टी सांगायची आणि गाणं ऐकवायचं, गाणं ऐकता ऐकता गाण्याचं बार टु बार नोटेशन काढतात. कसली तयारी असेल या माणसाची! ते खरोखर पट्टीचे वादक आहेत. टोनी वाझ म्हणून पंचमदांचे बेस गिटारवादक होते, उतारवयात त्यांना वृद्धाश्रमात राहायला लागले. त्यांची उतारवयात सगळी सेवा मनिष कुलकर्णीने वृद्धाश्रमात जाऊन केली. टोनीजींनंतर त्यांच बेस गिटार थेट मनिषदादाकडे. पंचमदांच्या गाण्यांमधलं बेस गिटार म्हणजे अतुलनीय. तीच नजाकत मनिषदादाच्या वादनात उतरलीये. गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय असलं होत नाही. मला नाही वाटत गुरुंची अशी सेवा हल्ली कोणी करत असेल.<br />
<br />
या सगळ्यांना साथ मिळाली ती दिपक बोरगांवकरांच्या साईड ऱ्हिदमची. तुम्हाला कसला आवाज हवाय एवढं फक्त सांगा, स्टुडिओभर त्यांची वाद्य असतात, त्यातुन ते वेळेत नेमक वाद्य शोधुन काढतात. पक्ष्यांचा, झऱ्याचा, वाहत्या पाण्याचा, घंटांचा, घुंगरुंचा, पाण्यात पडणाऱ्या थेंबांचा.........तुमच्या अपेक्षा पूर्ण होणारंच!<br />
<b><br />
धर्म हे वंश हे देश भाषा किती,</b><br />
<b> सर्व सीमा सहज सूर ओलांडिती </b><br />
<b> </b><b><br />
</b><br />
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dy2ib7fFg_nXXI32njg8nKf1MZ0ABGg_mEv7yzlMmeXp3P3LxWyZvShXXADQXUY6IbXzINhbcd8sKEnWzqUbA' class='b-hbp-video b-uploaded' frameborder='0'></iframe><b> </b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div>हे दाखवण्यासाठी आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातली वाद्य वापरुन ताल आणि सूर जुळवुन वरील ओळींचा अर्थ प्रगट केला. अक्षरश: १-१ बारसाठी नवीन वाद्य वापरलंय. म्हणजे गाण्यात एक वाद्य अंदाजे ५ सेकंदांसाठीच. ही सगळी वाद्य ते एवढ्या कमी अवधीसाठी शोधुन, ट्युन करून, परत त्याच जागी बांधुन ठेवत होते. एखादा असता तर कावला असता, आणि आम्हाला शिव्या हासडल्या असत्या. पण त्यांचा काम करण्यात असलेला लगाव तुम्हाला विडिओमध्ये दिसेलंच. आता हे गाणं बाजुच्या गाण्यांच्या यादी ऐका आणि कसं वाटलं ते सांगा. ‘बरसत आल्या अमृतधारा’मध्ये तर त्यांनी वाजवलेले घुंगरु डोळे मिटुन ऐकले तर समोर कथ्थक नृत्याच्या steps पण दिसतात, एवढं ते जिवंत वाजवलंय. दिपककाका तुफान आहेत!<br />
कंठसंगीताच्या रेकॉर्डिंगचा पहिलाच दिवस होता. जो गायक समोर येऊन गाणार होता, ज्याच्या आवाजात माझ्या अल्बमचं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं, त्या गायकाने जवळजवळ गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलं होतं. आणि असा गायक आपलं गाणं गातोय, यासारखी अभिमानास्पद गोष्ट कोणती असली तरी या गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यांचं नाव श्री. सुरेश वाडकर! नावाप्रमाणे सुरेश....... एका दिवसात ४ गाणी रेकॉर्ड केली. एक गाणं समाधानकारक झालं नाही. तेव्हाच आणि वेळ नसल्यामुळे काही दिवसांनी रेकॉर्ड करू परत असंही सांगितलं आणि त्याप्रमाणे केलं. मी त्यांच्यापुढे एवढा छोटा असुनही मी सांगितलेल्या चुका मोठ्या मनाने सुधारत होते. कुठेही मी नवोदित संगीतकार आहे अस मला भासवु दिलं नाही. कोणा लहान माणसामुळे लहान होण्याच्या पलिकडे गेले आहेत ते.....<br />
<br />
मंदारने तर मला सीडीची कल्पना डोक्यात आल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारे आणि वेळी मदत केली आहे. कितीही वरची पट्टी असली तरी त्याचा आवाज गोडच येतो. तो स्वतः उत्तम संगीतकार असल्यामुळे कवितेची जाण आहे त्याला. वैशाली तर विश्वगायिका शोभेल अशीच गायलीये. तिच्यातला सर्वात चांगला गुण असा कि तिला तिची चुक समजते आणि ती लगेच सुधारते. मोठं होण्याचं लक्षण आहे हे. श्रीरंग तर फारच सुरेख गायला आहे. त्याचा आवाजही गाण्याला साजेसा, कॉलेजमधल्या मुलासारखा आल्यामुळे ते गाणं एकदम तरुण झालंय.<br />
<br />
हे सगळं एकत्र बांधण्यात मला सर्वात जास्त मदत केली आनंदनी. त्याच्या संयोजनाने गाण्यांचं सोनंच नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी झालीत. Hats off to his sincerity, commitment, devotion, creativity and aesthetic sense. त्याच्या कामाची पद्धत बघुनच हा ‘लंबे रेसका घोडा’ असल्याची मला खात्री पटली.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/TH65r4boLuI/AAAAAAAACUU/CRv_sCK80-4/s1600/Aata+Ujadel.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/TH65r4boLuI/AAAAAAAACUU/CRv_sCK80-4/s320/Aata+Ujadel.jpg" width="308" /></a></div> सगळे गायक, वादक, रेकॉर्डिस्ट यांनी आपापली कामे चोख केली आहेत. आता पाळी श्रोत्यांची. उत्तम दर्जा राखण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते ते सगळं आम्ही आमच्यापरीनी केलं. सर्व गायकांनी, वादकांनी गाण्यांचं नुसतं सोनंच केलं नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी केली आहेत. ‘टेक’ म्हणून ते जे काही देतात ते घ्यावं तेवढं कमीच! त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी तरी ‘आता उजाडेल’ हा अल्बम सर्वांनी विकत घ्यावा हि माझी सुज्ञांकडुन किमान अपेक्षा आहे. आपणा सर्वांसाठी १०० रुपये जड नाहीत. ४० रुपयांमध्ये १५० गाणी आणि १०० रुपयांमध्ये दहाच गाणी? असा विचार कृपया कोणीही करु नये. ही दहा गाणी समोर येण्यासाठी खुप मेहनत, लगाव आणि कामावरची निष्ठा असायला लागते, ती ४० रुपयांमध्ये १५० तयार गाण्यांची सीडी बनवुन धंदा करणाऱ्यांना नाही समजणार. आपण सुज्ञं रसिक आहात, त्यामुळे पायरसी करणाऱ्यांमध्ये तुम्ही सहभागी होणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. आपण सीडी जरुर विकत घ्या, आणि तुमचा जो काही खराखुरा अभिप्राय असेल तो मला नक्की कळवा...धन्यवाद.<br />
<br />
<script src="http://connect.facebook.net/en_US/all.js#xfbml=1"></script><fb:like show_faces="true" width="450"></fb:like>ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-48701719122565710862009-10-12T22:13:00.002+05:302009-10-12T22:36:29.638+05:30क्षण"oh my god, आपल्याकडे अक्षरशः एकच क्षण आहे. आणि आपल्याला त्या एका क्षणात काय काय करायचंय ह्याची यादी मात्र भली मोठी आहे.<br />
सर्वात आधी पहिल्या सॅलरीमधुन आईला आणि आजीला साडी द्यायची होती.<br />
<br />
ताईला एक छानसं नेकलेस द्यायचं होती.<br />
<br />
बाबांना काय द्यायचं समजत नव्हतं, पण एखादा साधा सेलफोन घेउन द्यायचा होता. बाहेर गेले कि काही chanceच नसतो त्यांना contact करण्याचा. आणि नेहमी ते बाहेर गेले की सुचतं की अमुक एक वस्तु आणायला सांगायला हवी होती.<br />
<br />
येत्या रविवारी विन्याचा वाढदिवस आहे, फक्त ४ दिवसांनी. कॉलेज संपल्यावर पहिल्यांदा आमचा ग्रुप भेटणार आहे. पुढच्या क्षणी जे घडणार आहे त्यानंतर करेल का विन्या वाढदिवस साजरा? काय वाटेल माझ्या मित्रांना?<br />
<br />
आज बाबांशी खुप भांडले सकाळी सकाळी....बाबांचे मुद्दे विचारात घेता माझंही थोडं चुकलंच होतं. उगाच तोंड वर करून बोलले, आकांडतांडव केला. त्यांची माफी मागायची राहणारे.<br />
<br />
येत्या शनिवारी नाचाच्या बाईंकडे जाणार होते मी. कधीपासुन बोलवत होत्या त्या! नोकरी लागल्यापासुन नाच सुटलाय.<br />
<br />
दसऱ्याला ताईच्या साखरपुड्याची आणि दिवाळीची अशी एक भलीमोठ्ठी खरेदी करायची होती. पण आता शक्य नाही. वेळंच नाहीये तेवढा......<br />
<br />
निषाद मला मनापासुन आवडतो. त्याने प्रपोज केलं तेव्हा नाही म्हणाले खरी, पण माझं त्याच्यावर अतोनात प्रेम आहे हे त्याला सांगायचं आहे मला एकदातरी. तो तर हादरणार आहे.....बिच्चारा....<br />
<br />
मला आत्ता, या क्षणी घरी जायचंय, माझ्या आई-बाबांकडे, आजीकडे. त्यांची अवस्था बघवणार नाही मला. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. काय आभाळ कोसळेल त्यांच्यावर. एकमेकींच्या झिंज्या उपटेपर्यंत भांडलो मी आणि ताई, पण तिचं माझ्यावरचं प्रेम आज खुप miss करत्ये मी.<br />
<br />
आता डोळ्यात अश्रु येऊन काय फायदा? जे व्हायचे ते......"<br />
<br />
<i>एक क्षण, त्यात अर्धवट राहिलेल्या विचारांची साखळी...पार दुर कुठेतरी फेकली गेली......</i><br />
<i><br />
</i><br />
<i>sms टाईप न करता, mobile गुपचुप पर्समध्ये ठेवुन विक्रोळी सबवे क्रॉस केला असता, तर २० फुट दुर असलेल्या ट्रेनचा हॉर्न ऐकुन, दडपणामुळे रुळावरुन बाजुला व्हायला हवं याचंही जे भान राहिलं नाही ते राहिलं असतं आणि ज्या जबाबदाऱ्यांची जाणिव शेवटच्या क्षणी झाली ती काही क्षण आधी झाली असती, तर एक रेल्वे अपघात टळला झाला असता......</i>ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-29635655660409775392009-09-05T02:02:00.001+05:302009-09-05T13:38:18.851+05:30अताशा असले काही होत नाही........रात्री जेवण झाल्यावर कंप्युटर सुरु केला. gtalk वर login करणार एवढ्यात सोसायटीमधल्या देवळातून जोरजोरात बोलल्याचा आवाज यायला लागला. म्हणलं जरा जाउन बघु लफरा काय आहे ते....पाहिलं तर वडकेकाकू विरुद्ध सगळी तरुण मुलं वादावादी करत होती. तरुण म्हणजे ३५-४० वर्षांची. प्रत्येकाला पोरं-टोरं झाल्यामुळे आणि बायका होत्या त्यापेक्षा दुप्पट(आकाराने) झाल्यामुळे ह्यांचा संसारातला रस जरा कमी झालाय. वादावादी,लवकरंच होऊ घातलेल्या गणेशोत्सवावरून होती.<br />
<br />
<b>काकू</b> - तुम्हाला काही समजतंय का तुम्ही काय बोलताय ते? गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुम्हाला कव्वाली आणि लावणीचे कार्यक्रम हवेत?<br />
<br />
<b>बबन</b> - अहो काकू, मग त्याला काय झालं? आपल्याला कार्यक्रमांना लोकं हवीत कि नाही?<br />
<br />
<b>छग्या</b> - नाहीतर काय! च्यायला २-२, ३-३ वर्षांची मुलं रडत रडत स्टेजवर येणार. त्यांचे आई-बाबा त्यांना जबरदस्ती स्टेजच्या मध्यभागी ढकलणार, मग निवेदिका म्हणून काम करत असणारी, सोसायटीतली आगाऊ मुलगी त्या मुलांच्या तोंडासमोर तो माईक नाचवणार आणि एखादी कविता म्हणायला सांगणार. ते कारटं परत स्टेजच्या कडेशी उभ्या असलेल्या पालकांकडे धावत-रडत येणार, आई-बाप परत पोराला स्टेजवर ढकलणार. आणि ह्या सगळ्यासाठी लोकं, त्या लहान लहान मुलांना प्रोत्साहन म्हणून उपकार केल्यासारखे टाळ्या वाजवणार. <br />
<br />
<b>काकू</b> - अरे देवा! अरे गणेशोत्सव लहान लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीच असतो. आम्हीही दिलंय तुम्हाला प्रोत्साहन. तुम्ही काय छान कलाकार नव्हतात. वाट्टेल तसा मेक-अप करून यायचात. वाट्टेल तसे नाचायचात, काय ती नाटकं बसवलेली असायची, कोणताही डायलॉग कुठेही घातलेला असायचा, मध्येच कोणीतरी डायलॉग विसरायचं. हा छग्या तर प्रत्येकवेळी काही ना काही घोळ घालायचा. एकदा तर तो नाचता नाचता, स्टेजच्या कडांना आपण जे कापड बांधुन घेतो त्याला टेकला होता, आणि कापड आणि स्टेजच्या फटीतुन खाली पडला आणि त्याच फटीतुन परत वरती येत नाचायला लागला.(इथे हश्या)........तर असं सगळं असुनही आम्ही तुमचेच कार्यक्रम ठेवले आणि तुम्हालाच प्रोत्साहन दिलं.<br />
<br />
<b>छग्या</b> - ते काहीही असो हो, आमच्यामुळे तुम्ही हसलात ना? टाईमपास झाला ना? आम्ही जे करायचो ते जीव तोडून, हल्लीच्या मुलांना ढकलायला लागतं स्टेजवर.<br />
<br />
<b>गिऱ्या</b> - मागच्या वर्षी तो काय ऑर्केस्ट्रा आणला होता आपण, काय रेकत होते सगळे. त्यातल्या सगळ्या बायका हावभाव करून बेसुर गात होत्या.<br />
<br />
<b>छग्या</b> - आणि त्याही सुंदर होत्या असंही नाही.<br />
<br />
<b>बबन</b> - एका काकांना ५ वेळा once more दिला आता तरी बरं म्हणतील ह्या आशेने, तर प्रत्येक अटेम्प्ट घाण म्हणण्यात आधीच्या अटेम्प्टला स्पर्धा करत होता. मी अजुन एक once more देणार होतो. पण त्या आधी ह्यांनी चोप दिला होता मला.<br />
<br />
<b>छग्या</b> - बघा काकू! हे असले कार्यक्रम देण्यात काही अर्थ आहे का? एवढे ९७ ब्लॉक्स आहेत आपल्या इथे. त्यात ९० तरी मराठी आहेत. ९० लोक तरी असतात का खाली हजर? मॅक्सिमम लोक दिवे बंद करून खिडकीतुन बघतात कार्यक्रम. मग निवेदिका त्यांना खाली यायला सांगणार. ही अशी वेळ यावी आपल्यावर असं वाटतंय का?<br />
<br />
<b>काकू</b> - अरे तुमचे मुद्दे ठिक आहेत, पण म्हणून लावण्या आणि कव्वाल्या? <br />
<br />
<b>बबन</b> - अहो काकू तुम्हाला नाही समजत....लोकांचा उत्साह किती कमी झालाय!!! आज आपण ५ जण गणेशोत्सवाच्या मिटींगसाठी जमलोत. फक्त पाच!! पूर्वी कमीत कमी ३० लोकं असायची. तुम्हीच आठवून बघा. का कमी झाली असतील एवढी लोक? का उत्साह नाहीये लोकांना? का एवढा कमी सहभाग आहे उत्सवात? आरतीला जेमतेम २०-२५ लोक असतात. तेही कसेबसे रेटत आरती करतात. थोडं ऐकायला विचित्र वाटेल, पण तरी बोलतो. लोकं विसर्जनाला येतात तीसुद्धा अंत्ययात्रेला आल्यासारखी! ढोल-ताशेवाले त्यांच्या त्यांच्यात बडवत असतात, त्यांच्या आजुबाजुल २-३ लहान मुलं इकडुन तिकडे उड्या मारत असतात.ही अशी विसर्जनाची मिरवणूक? लोकांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. लोकं हवीत हो. त्याशिवाय उत्सवाला मजा नाही. उत्सव काय फ़क्त आपल्या ४-५ जणांचा नाहीये. आपण दारोदारी गेल्यावर खिशातुन वर्गणीचे २५० रुपये काढले म्हणजे लोकांची जबाबदारी संपत नाही.<br />
<br />
त्यांची ही बडबड ऐकली आणि मी घरी आलो. थोडं चॅट करून दिवाणावर झोपलो खरा, पण गणेशोत्सवाचा विषय काही डोक्यातुन जाई ना. खरंच पूर्वीसारखा उत्साह बिलकुल जाणवत नाही आता. सोसायटीत तसे लोकही राहिले नाहीत आता. मला लहानपणीचे दिवस आठवू लागले.<br />
<br />
सोसायटीचा पाचंच दिवसांचा गणपती असायचा, पण धमाल असायची. महिना महिना आधीपासून सुरु झालेल्या गाण्याच्या, नाचाच्या आणि नाटकांच्या तालमी अजुनही आठवतात,त्यात आपला विषय दुसऱ्यानी चोरु नये म्हणून पाळली गेलेली गुप्तता. सगळ्या आठवणी तरळू लागल्या.<br />
<br />
मी रोज संध्याकाळी शाळेतुन आल्यावर दप्तर कुठेतरी भिरकावून द्यायचो, थोडंसं काहीतरी गिळलं कि तालमीला जायला तयार! संध्याकाळचे २-३ तास काही क्षणात गेल्यासारखे वाटायचे. एकाकडे नाचाची प्रॅक्टिस. ती झाली कि तिथुन दुसरीकडे दुसरा ग्रुप डान्स. खरतर नाचाचा आणि माझा दुरान्वयेही काहीही संबंध नाही. पण केवळ संध्याकाळी अभ्यास करायला लागु नये म्हणुन सगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो. ज्यांना नीट नाचता यायचं ते उगाच टिंग्या मारून दाखवायचे, खास करून मुली. मग चिडवाचिडवी, भांडणं, कधी मारामाऱ्या. कधी कधी नाच बसवणारी ताई किंवा काकू काहीतरी खायलाही द्यायच्या. १-२ कचोऱ्या वगैरे.<br />
<br />
सगळ्यात मजा यायची ती नाटकाच्या प्रॅक्टिसला! लहानपणापासून पाठांतर आणि आपलं कधीही जमलं नाही. आणि पाठांतराशिवाय नाटक अशक्य. मग रोज सगळी पात्रं; खरोखरीच पात्र होतो आम्ही;एकत्र बसून २ आठवडे फक्त वाचनंच करतोय. एखाद्या इंग्रजी मिडियमच्या पात्राला मराठी वाचणं अवघड जायचं. मग त्याचं अडखळत वाचणं, चुकीचे उच्चार, त्यावरून हशा, चिडवाचिडवी असले प्रकार चालायचे.<br />
<br />
या सगळ्या तालमी झाल्या की मग ९-९.३० पर्यंत घरी यायचो. मग जेवण आणि अभ्यास होत नाही म्हणून आई-बाबांचं बोलणं एका कानानी ऐकून दुसऱ्या कानानी सोडत गुपचुप झोपायचो. सकाळी उठुन थोडं काहीतरी अभ्यासाचं वाचल्याचा आभास निर्माण करायचा, बाबांना उगाच एखादं कठीण गणित विचारलं की, ऑफिसच्या घाईत "संध्याकाळी सांगतो उत्तर" असं सांगुन बाबा निघुन जायचे आणि परत "नाटक पाठ करतोय" हे कारण सांगुन अभ्यासाचं पुस्तक इमानदारीत परत दप्तरात जायचं.<br />
<br />
हा दिनक्रम १-१.५ महिना चालायचा. गणपतीच्या आठवडाभर आधीपासून सजावटीचं काम सुरु व्हायचं. अर्थात, आम्हा लहान मुलांच त्यात काहीच काम नसायचं. आमच्यापेक्षा मोठी मुलंच ते करायची. त्यांच्यातला एखादा आर्किटेक्ट त्यात सिंहाचा वाटा उचलायचा. आम्ही उगाच फेविकॉल आणुन देणं, पताकांच्या माळा बनवणं असली चिरी-मिरी कामं करायचो. मजा असायची पण त्यात. आणि आपण किती छान पताका लावतोय असं वाटायचं, फार मोठं काम करतोय असं वाटायचं.<br />
<br />
गणपतीच्या आदल्या रात्री बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस असायच्या फ्लड लाईट्समध्ये. सुरुवातीला सगळे एकदम शांतीत खेळायचे. म्हणजे, एरवी खेळताना जो आरडाओरडा असतो,"कॅच इट", "धाव", "फेक", "आवस्दे"(हाउज दॅट) हे शब्द हळु आवाजात बाहेर यायचे. खेळाच्या नादात रात्रीचा शुकशुकाट आम्ही घालवायचो, आणि मग घराघरातुन लोकं आम्हाला उद्देशुन खिडकीतुन शुकशुकाट करायचे. त्यात परत रडारडी, एखादी रन ढापणे, उगाच नो-बॉल देणे असले प्रकार चालत. आणि हे सगळं झालं, की सजावटीवर शेवटचा हात फिरवला जायचा.<br />
<br />
तेव्हा आमच्या शाळेला गणपतीची ५ दिवस सुट्टी असायची. या बाबतीत आत्ताची मुलं दुर्दैवी आहेत. आणि ते ५ दिवस म्हणजे ऐश असायची. सगळी मुलं अखंड खाली असायची. लहान-मोठी मुलं-मुली एकत्र खेळायची. लगोरी, लंगडी, ड्बा-ऐसपैस, खो-खो, संगीत-खुर्ची हे ठरलेले खेळ. गणपतीसाठी आणलेला लाऊड-स्पिकर आम्हीच जास्त वापरायचो. संगीत-खुर्ची खास करून याच ५ दिवसात खेळायचो आम्ही. या सगळ्यात एक कॉमन असायचं, ते म्हणजे कोणीतरी रडीचा डाव खेळायचं आणि त्यावरून होणारी भांडणं!<br />
<br />
संध्याकाळी कार्यक्रमांचे वेध लागायचे. महिनाभर केलेली प्रॅक्टिस, त्यात केलेल्या चुका, त्या स्टेजवर होऊ नयेत म्हणून मनाशी बांधलेल्या खुणगाठी, टेन्शनमुळे पोटात होत असलेली गुडगुड, भाड्याने आणलेले ऐतिहासिक कपडे, त्या विचित्र मेक-अपमध्ये तासन-तास आपल्या कार्यक्रमाची वाट बघणं,स्टेजवर चुका व्हायच्याच! कोणाच्या न कोणाच्या धोतरांच कासोटं सुटायचं किंवा नाचता नाचता टोपी पडायची, मग ती फटकन उचलण्याचे प्रयत्न व्हायचे,कोणीतरी एखादा वेगळीच स्टेप करायचा, कोणी दुसऱ्याच्या स्टेप्स बघुन नाचायचा, एका नाचानंतर लगेच लागलेला आपला दुसरा नाच किंवा नाटक, त्यात वेगळी वेशभुषा, त्यासाठी धावपळ करणं, आणि दमछाक होणं, आपल्याबरोबर आपल्या आई-बाबांची पळापळ होणं, ह्या सगळया गोष्टी संध्याकाळी व्हायच्याच! त्यातली मजा और!<br />
<br />
गणपतीची आरती म्हणजे तर काय हवा असलेला आणि सहन होणारा गोंधळ! ज्ञानेश्वराची आरती, "आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म"मध्ये जास्तीत जास्त श्वास लांबवण्याची चढाओढ, त्यात मॉबचा synchro जायचाच! कडव्यानंतर परत धृपदावर आल्यावर दुप्पट वेगाने टाळ्या आणि झांजा वाजवणं, आपल्यापासून हातभर लांब असलेल्या माईकमध्ये आपला आवाज जाण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडायचो. आरतीला कमीत कमी ६०-७० लोकं तरी असायचेचं. पण त्यातल्या फक्त ३-४ लोकांनाच मन्त्रपुष्पांजली यायची. आणि त्यांच्यात एक माझे बाबा असल्याचा अभिमानही वाटायचा मला!<br />
<br />
चवथ्या दिवशी रात्री बक्षिस समारंभ. हा समारंभ नावाला असायचा. कारण सादरीकरण केलेल्या सरसकट प्रत्येकाला कमीत कमी एखादं पेन किंवा स्केचपेनचा सेट मिळायचा. त्यामुळे उदास कोणीच व्हायचं नाही.<br />
<br />
गणपतीचा पाचवा दिवस आणि रविवार संध्याकाळ यातलं औदासिन्य सारखंच! "उद्यापासून ही मजा संपणार" ही जाणिव असायची आणि "ठिके आत्ता मजा करून घेउ" असं लगेच मनात यायचं. पाचव्या दिवशीची संध्याकाळची आरती तर फारंच उदास करायची. सगळेजण जोरजोरात म्हणायचे पण त्यात आनंद नसायचा. हे सगळं आता वर्षभरासाठी संपणार. गणपती परत आपल्या गावी जाणार ह्या विचाराने मन उदास होऊन जायचं. "अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी" ही ओळ आली की फार गहिवरून यायचं. किंवा गाऱ्हाणं सुरु झालं की, आणि सर्वात शेवटी नकळत झालेल्या चुकभुलींची माफी मागणारे शब्द आले की डोळ्यात पाणी तरारलं जायचं. कोणी कोणी स्वतःच्या घरचे प्रसाद आणि गणपतीला दाखवायला नैवेद्य घेऊन यायचे. त्यात एखादा उकडीचा, एखादा तळणीचा मोदक मिळायचा. अनेक प्रकारच्या बर्फ्या.<br />
<br />
विसर्जनाची मिरवणूक एकदम जोशभरी! मग गोविंदा-स्टाईल नाच व्हायचे. मुली आणि बायका रिंगण करून नाचायच्या, फुगड्या घालायच्या. मग कोणीतरी एखाद्या जरा साठी ओलांडलेल्या आजी-आजोबांना ओढायचे आणि मग ते एखादी अतिशल स्लो फुगडी घालायचे, मग अर्धा रस्त्यावर प्रत्येकी एकेक वडापाव. आम्ही २ तरी खायचोच, गोळ्या मिळायच्या.<br />
<br />
विसर्जनाच्या ठिकाणी अनेक घरगुती आणि छोट्या छोट्या सोसायट्यांचे सार्वजनिक गणपती असायचे. त्यांच्या आरत्या, आमच्या आरत्या एकमेकींमध्ये मिसळायच्या. शेवटी गणपतीबाप्पा मोरयाच्या आरोळ्या. मग प्रसाद म्हणून आंबेडाळ मिळायची. गणपतीची मूर्ती २-३ तरूण मुलं उचलुन तळ्यापाशी न्यायची. तिथल्या स्वयंसेवकाच्या स्वाधीन ती मूर्ती केली जायची. गणपतीला घेऊन ते लोकं लांब पाण्यात घेऊन जायचे. अर्धवट बुडालेला गणपती हळूहळू लांब जाताना दिसत राहायचा. दोनदा मूर्ती तळ्यात बुडवून तिसऱ्यांदा गणपतीसोबत ते लोकं खाली पाण्यात जायचे. हा प्रसंग प्रत्यक्षात घडत असताना मन भरून यायचं, कंठ दाटुन यायचां;<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/SqIcVwe4uYI/AAAAAAAAA54/k_Nozdjso7A/s1600-h/ganu_050908_ganpati4.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/SqIcVwe4uYI/AAAAAAAAA54/k_Nozdjso7A/s320/ganu_050908_ganpati4.jpg" /></a></div><br />
गणपतीबाप्पा मोरया,<br />
पुढच्या वर्षी लवकर या, <br />
गणपती गेले गावाला,<br />
चैन पडेना आम्हाला.......<br />
<br />
या फक्त मिरवणूकीत ओरडायच्या ४ ओळी नाहीत. ह्या खरोखर मनींच्या भावना आहेत हे त्या शेवटच्या क्षणी जाणवायचं.ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-28736639354789207002009-08-28T22:53:00.000+05:302009-08-28T22:53:32.522+05:30अध्याय चौदा - फलश्रुतीश्रोते साष्टांग नमस्कार । तुमच्यामुळे साचार ।<br />
स्वप्न झाले साकार । आता चिंता नसे मज ॥<br />
<br />
‘ती’पुराण जो वाचेल । तो निश्चित काही शिकेल ।<br />
मम अनुभवाचा करेल । स्वतःसाठी फायदा ॥<br />
<br />
ह्या ‘ती’पुराणात । आहेत काही इशारे खास ।<br />
अधोरिखित करतो त्यास । केवळ तुमच्या भल्यासाठी ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या एक समजुन ।<br />
एका मुलीवाचुन । दुसरीसाठी धावू नये ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही समजुन ।<br />
मुलीसाठी तुम्ही सोडून । दोस्तांस तुमच्या जाऊ नये ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही समजुन ।<br />
तुमच्या दोस्तांवाचुन । वाली तुमचा कुणी नसे ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही जाणुन ।<br />
सर्वांशी चांगले वागुन । ह्रदय तुम्ही जिंकावे ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही भिनवून ।<br />
जरी आभाळ गेले पडून । मुलीस कधी शिकवू नये ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही समजुन ।<br />
आपल्या घरापासून । वंचित मुलीस करू नये ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही उमजुन ।<br />
स्वत:वर पूर्ण विश्वासून । मगच प्रेम करावे ॥<br />
<br />
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही जाणून ।<br />
तुम्ही प्रेम केले म्हणून । ‘ती’च्याकडून अपेक्षु नये ॥<br />
<br />
हे पुराण वाचोनि । गोष्ट एक जाणावी ।<br />
मुलीच्या जे असे मनी । तेच खरे होते ॥<br />
<br />
चुकून झाला प्रेमभंग । अडकावे न त्यात ।<br />
आयुष्याचा प्रवाह । मान्य करावा हर्षे ॥<br />
<br />
ऐसे न जरी केले । पाणी तिथे साचवले ।<br />
दलदल होऊन तुम्ही भले । त्यात अडकाल नि:संशय ॥<br />
<br />
असो हा कळसाध्याय । ‘ती’पुराण हा स्वाध्याय ।<br />
शिकुन घ्यावे काय काय । हे तुमच्यावर विसंबे ॥<br />
<br />
इति श्री ममविरचित । चौदाध्यायी ‘ती’पुराण ।<br />
प्रेमीजनांचे होवो तारण । ऐसी प्रार्थना जगज्जेठी ॥<br />
<br />
॥ शुभं भवतु ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-5712616025017114632009-08-28T21:15:00.000+05:302009-08-28T21:15:59.609+05:30अध्याय तेरा - निकालश्रोतेजनांसि वंदन । तुम्ही अभिष्टचिंतन ।<br />
द्यावे मजसि आतुन । थेट कप्प्यातुन ह्रदयाच्या ॥<br />
<br />
दिवस खरेच आजचा । आहे फार मोलाचा ।<br />
प्रश्न जीवन-मरणाचा । आहे खरा नि:संशय ॥<br />
<br />
ठरल्याप्रमाणे तयारी । करून मनाची सारी ।<br />
निघालो दोपहरी । भेटावयासि ’ती’ला ॥<br />
<br />
एवढे निकाल आजवरी । लागले आहेत परि ।<br />
एवढे काहुर अंतरी । नाही कधीच माजले ॥<br />
<br />
कँटिनमध्ये बसुन । मग्न झाले नयन ।<br />
चालु होते चिंतन । ‘ती’च्याच विचारांचे ॥<br />
<br />
आणि अखेर स्वारी । पडली दुरुनच दर्शनी ।<br />
अन सावरलो अंतरी । जवळच ‘ती’ येता ॥<br />
<br />
नजरेस ‘ती’च्या नजर । भिडवायास वाटे डर ।<br />
पण सौंदर्याचा कहर । रोखु न शके मजला ॥<br />
<br />
क्षणभर पाहुनि ‘ती’जसि । झुकली माझी दृष्टी ।<br />
अन त्याच क्षणी वृष्टी । झाली सुरु ‘ती’ची ॥<br />
<br />
"अनेक मुलं आजवर । पडले माझ्या प्रेमात ।<br />
त्यातल्या एकाने धाडस । केले खरे बोलण्याचे ॥<br />
<br />
आठवते का तुजला । त्यानंतर तु एकला ।<br />
येऊन मला भेटला । समजुत माझी काढावया ॥<br />
<br />
त्यापूर्वी ही एकदा । लागले होते नादा ।<br />
शोधु लागले आनंदा । दु:संग मला लागला ॥<br />
<br />
तेव्हा गिळुन अवमान । झाकुन अपुला अभिमान ।<br />
आलास तु धावुन । सांभाळलेस मजला ॥<br />
<br />
मित्र म्हणुन आजवरी । लाभली तुझी संगत खरी ।<br />
तुझपरी मित्र निर्धारी । मला न कदा मिळाला ॥<br />
<br />
मजसाठी तु खरोखरी । भांडलास नेकवारी ।<br />
धाडस तुझे सत्त्वरी । वाखाणते मी आज ॥<br />
<br />
रिक्षावाला फसवता । झालास तत्क्षणी भांडता ।<br />
तोडून त्याच्या दाता । आणलेस त्याला वठणीवर ॥<br />
<br />
खरोखरंच रे तद्वेळी । वाटलास तू महाबळी ।<br />
तुझ्या धाडसाची मी केली । स्तुतीच केवळ मनोमनी ॥<br />
<br />
तू एवढा कलासक्त । तू मोठा रसिक ।<br />
आहे तुजला कवीमन । सर्वकाही छानसे ॥<br />
<br />
कधी कपट कारस्थान । आले न तुझ्या मनातुन ।<br />
निर्मळ आत-बाहेरुन । मानले बा तुला मी ॥<br />
<br />
सर्वांशी छान वागशी । दु:ख परांचे वाटुन घेशी ।<br />
नात्यांमधे येऊ न देशी । कधीही त्या दमड्याला ॥<br />
<br />
हाच तुझा सद्गुण । आवडे फार मजलागुन ।<br />
कधी न सोडी त्यालागुन । ह्यामुळेच तू निराळा ॥<br />
<br />
सद्गुणांसि धरिसी । फार असून धाडसी ।<br />
जिच्यावरी प्रेम करिसी । तिलाच बोलाया घाबरतो ?"<br />
<br />
अन मध्येच थांबली । मैत्रिणीस पुटपुटली ।<br />
मैत्रिण ‘ती’ची पोचलेली । दूर जाऊन थांबली ॥<br />
<br />
"थोडा असशी भांडकुदळ....असे ना का?<br />
थोडा असशी विचित्र....असे ना का?<br />
थोडा असशी ढेरपोट्या....असे ना का?<br />
मजसाठी तूच लिओनार्डो.........."<br />
<br />
ऐसे म्हणुन अखेरी । माझा कर धरून करी ।<br />
झटकून जळमटांसि दूरी । नाते केले पारदर्शी ॥<br />
<br />
तो क्षण मजप्रत । मोददायी नी उत्कट ।<br />
त्या एका क्षणाप्रत । मजला न मुळी वर्णवे ॥<br />
<br />
जे जे पाहिले स्वप्नी । ते ते पाहिले आज नयनी ।<br />
आभार मानितो चक्रपाणी । सर्वात्मका जगदोद्धारा ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-12369385034721558832009-02-04T21:33:00.003+05:302009-05-05T11:26:59.947+05:30अध्याय बारा - धडधडनमस्कार श्रोतेजन । मध्ये गेले कैक दिन ।<br />व्यग्र होते माझे मन । काही कामी अत्यंत ॥<br /><br />असो पुढील कथेसि । ऐका देऊन कर्णासि ।<br />सतर्क ठेवावे मनासि । तुम्ही अपुल्या श्रोतेजन ॥<br /><br />माझे मन ‘ती’च्यात । गुंतले होते साक्षात ।<br />फार व्हायची यातायात । काय करावे सुचेना ॥<br /><br />ठरवून मी मानसी । राखिले काही ‘अंतरासी’ ।<br />‘ती’च्यापासून निश्चयेसी । शहाणपण जे सुचलेले ॥<br /><br />मम मनचि भावना । राखणे माझ्याच मना ।<br />हि माझी कल्पना । पटे ना ‘ती’च्या सखिस ॥<br /><br />एक दिन ‘ती’ची सखी । म्हणली सांगते ‘ती’येसी ।<br />भाव साचले अंतरासी । जे आहेत तुझिया ॥<br /><br />मी म्हणलो अबब । करू नको हा अविचार ।<br />ह्याचे परिणाम साचार । नाहीत चांगले ऐक हे ॥<br /><br />परंतु ‘ती’चि सखी । हट्टाला पेटली साची ।<br />मी समजलो आत गोची । इथे आपली होणार ॥<br /><br />आणि अखेर एक दिनी । कॉलेजनंतर माध्यान्ही ।<br />‘ती’च्या प्रीय सखिनी । कथिले ‘ती’ला सर्वही ॥<br /><br />सखिचा आला फोन । म्हणाली दोपहरी दोन ।<br />वाजता सोडते मौन । सांगते काय वदली ‘ती’॥<br /><br />इथे माझी हालत । मी तळ्यात मळ्यात ।<br />ह्रदय होते धडधडत । एक पळ म्हणजे एक युग ।ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-3605423829247085332008-09-12T19:22:00.006+05:302008-09-15T11:04:26.637+05:30अध्याय अकरा - शहाणपणअपुल्या मातॄभाषेत । आहे गोष्ट म्हणण्यात ।<br />ठेच लागता पुढच्याप्रत । होई मागचा शहाणा ॥<br /><br />ऐसेच काहीसे झाले । अघटित काही घडले ।<br />शहाणपण मज आले । त्या प्रसंगावरून ॥<br /><br />एकदा उपहारगॄही । वाटले असतिल सर्वही ।<br />परि नव्हते तेथे कोणिही । ‘ती’ एकटी बसलेली ॥<br /><br />जवळ जाऊन पाहिले । पाखरूच फक्त दिसले ।<br />येता मी, ह्ळुच पुसले । डबडबलेले नेत्रद्वय ॥<br /><br />मी केली चौकशी । का रोदन करशी?<br />काय दु:ख झाले तुशी । सांग मजला वेगे ॥<br /><br />ऐसे मी पुसता ‘ती’ । झाली मजला अलिंगिती ।<br />गालावरून ओघळती । अश्रुधारा अव्याहत ॥<br /><br />अखेर अश्रु आवरले । पाखरु माझे सावरले ।<br />अन बोलू लागले । मजला त्वेषाने ॥<br /><br />लोक मैत्री करती । परि आगळेच भाव अंतरी ।<br />प्रेमासाठी ते करती । नाटक मैत्रीचे ॥<br /><br />ऐसे ‘ती’ बोलता । मीही झालो टरकता ।<br />वाटले बहुदा हिला आता । कळले भाव अंतरीचे ॥<br /><br />परंतु समजले नंतर । सर्व मजला साचार ।<br />होता हिच एक मैतर । त्याने केला पराक्रम ॥<br /><br />त्याने हिला प्रेमाची । भावना बोलून दाखवली ।<br />आणि खोटी ठरवली । मैत्री अपुली विबुधहो ॥<br /><br />ह्या सा-या प्रकारात । शहाणपण आले अंगात ।<br />अपुलीहि होणार हिच गत । जर आपण काही बोललो ॥<br /><br />नाद मी सोडला । हिला मिळवण्याचा भला ।<br />मैत्रीचा नियम पाळिला । राहुन गुमान तोंडाने ।<br /><br />झुरत होतो अंतरी । कुढत होतो अंतरी ।<br />रडत होतो अंतरी । नव्हता दुसरा उपाय ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-30904015967344131622008-08-10T14:31:00.007+05:302008-09-01T21:08:17.567+05:30अध्याय दहा - आठवणीदंडवत तुम्हा श्रोते । केवळ तुमच्या आशीर्वादे ।<br />बरवी झाली उत्साहाते । थोडी काही वाढ ॥<br /><br />आजच्या या अध्यायी । मी सांगेन खास काही ।<br />थोडे काही ‘ती’च्याविषयी । जैसे असेल स्मरणी ॥<br /><br />माझ्या गेही गणपतीला । बोलावले मी सर्वांना ।<br />म्हणले यावे दर्शनाला । ब्रह्मांडनायक गणेशाच्या ॥<br /><br />तेव्हा ‘ती’हि आली । त्या सर्वांच्याही आधी ।<br />म्हणली मदतीसाठी । आले तुझ्या आईच्या ॥<br /><br />घरी येणा-या मंडळींची । सरबराई करण्यासाठी ।<br />राबली बरोबरीनी । ‘ती’ माझ्या आईच्या ॥<br /><br />खरंच श्रोते त्यादिवशी । आईसुध्दा खुष झाली ।<br />म्हणली हवी ऐशी । सून आपल्या घरी ॥<br /><br />माझ्या लहान भावाला । आला होता ताप भला ।<br />ठेवले त्याला हॉस्पिटला । होता झाला नाईलाज ॥<br /><br />एक दिवस संध्याकाळी । कोणी नव्हते त्याच्या जवळी ।<br />माझी हि कळी कोवळी । आली तेव्हा मदतीला ॥<br /><br />आणखीन किस्सा एक । बसवून वर्गात माणूस ‘फेक’।<br />बुडविले तास अनेक । टवाळक्या करण्याकरीता ॥<br /><br />मी आळशी मुळात । फिरण्याची सवय जन्मजात ।<br />त्यामुळे अभ्यास करण्यात । रसच नसे मजला ॥<br /><br />‘ती’च मला अनेकदा । पडून माझ्या फंदा ।<br />मानून मला खास बंदा । माझा अभ्यास करे ‘ती’॥<br /><br />गोष्ट मोठी हास्यास्पद । नाही परि संशयास्पद ।<br />नेहमी ‘ती’ लिहुन देत । असाईंन्मेन्ट्स मला ॥<br /><br />दिवाळीत सांजेचे । आमंत्रण फराळाचे ।<br />दिले होते मी साचे । माझ्या सर्व गड्यांसी ॥<br /><br />माझ्या सर्व गड्यांमध्ये । एकट्या ‘ती’च्यामध्ये ।<br />होते चातुर्य आणावयाचे । फराळ माझ्या घरी ‘ती’चा ॥<br /><br />घरी जाया जेव्हा निघाले । सर्वजण अपुल्या भले ।<br />केवळ ‘ती’ने वाकून केले । दंडवत माता-पित्यासी ॥<br /><br />असो, असे अनेक प्रसंग । घडले, असता ‘ती’ संग ।<br />परि एक घडला प्रसंग । सांगेन पुढे कधीतरी ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-71231695974346635312008-07-27T23:10:00.002+05:302008-08-02T01:13:46.595+05:30अध्याय नऊ - मोर्चेबांधणी...श्रोते तुम्हास दंडवत । माझा तुम्हास साक्षात ।<br />सद्भाव असल्या मनात । भगवंत येतो मदतीला ॥<br /><br />त्याची प्रचिती तुम्हास । कथिली मागील भागास ।<br />`ती"च्या पूर्ण मनास । मी होते जिंकिले ॥<br /><br />माझा सद्भाव एकदाचा । `ती'च्या ध्यानी आला साचा ।<br />अंतिम विजय सत्याचा । हा न्याय खरा असे ॥<br /><br />`ती'ला माझा विश्वास । वाटू लागला खास ।<br />माझा तिला लागला ध्यास । अंदाज मम आला ॥<br /><br />संपर्क राती-बेराती । करू लागली निर्धास्ती ।<br />शंका-निरसनाप्रती । दूर कराया कारणे ॥<br /><br />कित्येक मिस्ड कॉल देई । एसेमेस करी तेही ।<br />झोपू न देई निशी । पाठवून मेसेज भावुक ॥<br /><br />माझा निश्चय दॄढ झाला । वाटे हिच्या मनाला ।<br />आला प्रेमाचा उमाळा । आता आपण जाऊ पुढे ॥<br /><br />परी धीर होईना । पुढे मजला जाववेना ।<br />वाटे मनींच्या कामना । कळो हिला नकळत ॥<br /><br />`ती' येता समोर । बावरे होई मन ।<br />जैसे की ते मांजर । घुटमळणारे पायात ॥<br /><br />मी करे निश्चय । आता बोलावे आपण ।<br />कशी करावी सुरुवात पण । हाची असे प्रश्न मज ॥<br /><br />कित्येक पत्रे लिहिली । आणि फाडून टाकिली ।<br />मनाप्रमाणे नाही झाली । बांधणी पत्राची हे समजताच ॥<br /><br />`ती' आपल्याबद्दल । काय विचार करेल ।<br />हाच एक सवाल । छेडीत होता मजला ॥<br /><br />`ती'च्या मनी नसेल काही । अन होईल अपुली फजिती ।<br />लागून राहिली ही भीती । कसे दूर करावे ती ॥<br /><br />रोज मी विचार करी । आज हिला सांगू खरी ।<br />भावना मनीची सारी । आपल्या गोड वैखरीने ॥<br /><br />विचार हा येता मना । पोटात येई मोठा गोळा ।<br />कुठूनसा मोठा भला । कावलो मी तयाला ॥<br /><br />ओळख होऊन आज । गेले भुर्रकन षट्मास ।<br />गाडी नव्हती आसपास । माझ्या ध्येयाच्या ॥<br /><br />मोर्चेबांधणी माझी । सुरूच राहिली साची ।<br />बात माझ्या प्रेमाची । राहिली तिथल्या तिथेच ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-78015236072575225202008-07-22T20:05:00.005+05:302008-08-02T01:14:02.793+05:30अध्याय आठ - उपरतीश्रोते सस्नेह वंदे । योजुनी छलिकेचे धंदे ।<br />भरले आम्ही कांदे । हितशत्रुंच्या डोस्क्यात ॥<br /><br />छलिकेची पायरी । चढलो एक सोडून वरी ।<br />आता गंमत आली खरी । ऐका जरा श्रोते ॥<br /><br />एकदा माझ्या सदनी । ह्या मंडळीस बोलावूनी ।<br />केली गाणी-बजावणी । खिशात टाकले सा-यांसी ॥<br /><br />‘ती’ही एकदम चपापली । आदराने पाहू लागली ।<br />नजर ‘ती’ची जरा न हलली । माझ्यावरून यत्किंचित ॥<br /><br />माझ्या हितशत्रुंना । एकही कला अवगत ना ।<br />समाधान माझ्या मना । वाटले तेव्हा अनंत ॥<br /><br />त्यानंतर बरेचदा । घरी बोलावले एकमेकां ।<br />पार्ट्या केल्या ओल्या-सुक्या । आम्ही सोबतच ॥<br /><br />म्होरक्याने त्यांच्या । एकदा बोलावले आम्हाला ।<br />घरी त्याच्या जेवायला । एकटा असल्याकारणे ॥<br /><br />ऐनवेळी मी दिली । त्याला टांग भली ।<br />माझ्याविना इतरांनीही । जाण्यास नकार दिला ॥<br /><br />परी ‘ती’ला जायचे । होते त्याच्या घरी साचे ।<br />त्यासाठी ‘ती’ अमुचे । पाय धरू लागली ॥<br /><br />शेवटी ‘ती’ रागावून । त्यांच्यासमवेत निघून ।<br />गेली आम्हास टाकून । म्हणले बिघडले पाखरू ॥<br /><br />परी ‘ती’चे जाणे । होते माझ्या खेळाप्रमाणे ।<br />कारण ठरले होते करणे । पार्टी तिथे ओली ॥<br /><br />ऐनवळी मी मुलींना । बोलावले त्याच्या सदना ।<br />आणि नकार दिला जाण्या । धुडकावूनी तया आमंत्रणा ॥<br /><br />कारण कार्टे होते निर्लज्ज । ‘ती’च्यासमोर होतिल सज्ज ।<br />घेऊन हातात ग्लास । भरूनीया सोमरसाचे ॥<br /><br />मला त्यांच्यावर । होता पूर्ण विश्वास ।<br />माझ्या अपेक्षेनुसार ।ते वागणार हे निश्चित ॥<br /><br />‘ती’ गेल्यावर एक तास । होतो आम्ही कॉलेजास ।<br />चिंता होती माझ्या मनास । काय करत असेल ‘ती’?<br /><br />आणि पुढच्या पाव तासात । रडत रडत ‘ती’ आली आत ।<br />शब्द न येई मुखात । ‘ती’च्या काही केल्या ॥<br /><br />शिरली सखीच्या मिठीत । पाणी अखंड नेत्रांत ।<br />होते नाक फुरफुरत । लाल झाली रडून ‘ती’ ॥<br /><br />मीही गेलो जवळ । करावयासी सांत्वन |<br />करून मोठे धाडस । काय झाले विचारले ॥<br /><br />माझ्याकडे बघुनी । ओलावलेल्या डोळ्यांनी ।<br />जोरात मजला बिलगुनी । रडली ती हमसून ॥<br /><br />चूक तिजला उमगली । मैत्रीस मात्र ती जागली ।<br />ना माफी मागितली । झाली अमुची ‘ती’ परत ॥<br /><br />पूर्वीसारखी ‘ती’ । वागू लागली परत ‘ती’<br />भेटली जुनी ‘ती’ । त्या ‘ती’ला तोड नाही ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-46942494316983001272008-07-17T19:54:00.001+05:302008-08-02T01:14:22.054+05:30अध्याय सात - छलिकाश्रोतेहो नमस्कार । मानतो मी आभार ।<br />तव आशीर्वादे आकार । घेतला कथेने इथवर ॥<br /><br />श्रोतेहो ‘ती’ज रक्षण्या । करण्या रिपुंच्या कण्या ।<br />डाव अमुचा योजिण्या । चालवली अमुची बुद्धी ॥<br /><br />‘ती’ला जिंकिले होते त्यांनी । भुरळ ‘ती’जवर घालोनी ।<br />थोडे दूर मजपासोनी । केले तयांनी मम पाखरा ॥<br /><br />जिंकण्यासी पुन्हा ‘ती’ला । रिपुंस दूर लोटण्याला ।<br />युक्तीस माझ्या चालवण्याला । भाग होते निश्चित ॥<br /><br />लावण्यासी त्यांची वाट । शोधणे मज वहिवाट ।<br />आगळी अन बिकट । अनिवार्य होते जनहो ॥<br /><br />एक गोष्ट निश्चित । ध्यानी आली खचित ।<br />रिपुंशी त्या मजप्रत । मैत्री करणे भाग असे ॥<br /><br />मित्रच एका मित्राची । वाट लावू शकतो साची ।<br />शत्रुस एक मित्रचि । घातक बनू शकतो खरा ॥<br /><br />ह्या सर्व प्रकारात । साथ होती मजप्रत ।<br />सवंगड्यांची सोबत । अखंड ती सुदैवे ॥<br /><br />आम्ही करतसू लबाड्या । काढतसू ‘ती’च्या खोड्या ।<br />बोलवतसू ‘ती’च्या सवंगड्या । नेहमी अमुच्यासमवेत ॥<br /><br />दोन-तीनदा काही सिनेमे । पाहिले आम्ही त्यांच्यासंगे ।<br />अमुच्या मैत्रीची सोंगे । ध्यानी न येती तयांच्या ॥<br /><br />कधीतरी पिझ्झा हटात । कधीतरी इनॉर्बिटात ।<br />घेतसू त्यांसी संगत । अमुच्याही अधेमधे ॥<br /><br />अशाप्रकारे एक मास । आम्ही खर्चिला खास ।<br />मिळविण्या ‘ती’चा विश्वास । काय न आम्ही केले ॥<br /><br />रिपुंचा विश्वास होताच । ‘ती’चाही झाला मिळताच ।<br />धन्यता लाभली साच । थोडी माझ्या जीवा ॥<br /><br />राजकारण हे अमुचे । खटकेल कोणासही साचे ।<br />परी हेतु होते अमु्चे । चांगलेच निश्चित ॥<br /><br />ह्या असल्या खेळास । कोणाचे चांगले होण्यास ।<br />खेळलेल्या राजकारणास । छलिकाविद्या नाव असे ॥<br /><br />तब्बल चार सहली । त्यांच्यासमवेत केल्या आम्ही ।<br />तेथे फूस लावली । त्यांना व्यसने करण्यास ॥<br /><br />अर्थात आम्ही होतो दूर । नाही काढला जरा धू्र ।<br />आमचा हा आगळा नूर । कळलाच नाही कवणाला ॥<br /><br />अशाप्रकारे अमुची । साधना छलिकाविद्येची ।<br />चालूच राहिली साची । काही दिसांसाठी ॥<br /><br />ह्यापुढील पायरी । आम्ही गाठली लवकरी ।<br />कळवू त्याची मात सारी । लवकरच तुम्हासी ॥<br /><br />तत्पूर्वी आपला । निरोप घेणे भाग मला ।<br />सदिच्छा त्या अपुल्या । सदैव पाठीशी असुद्या ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-52354069554286977822008-07-11T10:38:00.001+05:302008-08-02T01:14:39.444+05:30अध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशीश्रोते मागे म्हटल्यागत । जे होते अभिप्रेत ।<br />तेच घडून होते येत । माझ्या `ती'च्या बाबतीत ॥<br /><br />मैत्री दिनाच्या दिशी । मैत्री झाली अनेकांविशी ।<br />जो तो उडवून दाखवे मिशी । आपुली हिच्यापुढे ॥<br /><br />मी त्या सर्वांविषयी । हिला बोललो त्याच समयी ।<br />हि मंडळी मोहमायी । जाळे टाकेल तुजवर ॥<br /><br />तिला हे रुचले ना । माझे बोलणे पटले ना ।<br />तिने माझे ऐकले ना । त्यांना बोलवी आमच्यात ॥<br /><br />अमुच्या छान कंपुत । ते होते आगंतुक ।<br />तिची मोकळी वागणूक । पसंत होति तयांना ॥<br /><br />माझे सर्व सवंगडी । तिची एक सखी बापडी ।<br />ह्यांनी घालून पाहिली काडी । ही आणि त्यांच्यात ॥<br /><br />हिला समजले । आमचे हेत उमजले ।<br />परी ना गवसले । हित तिचे त्यातले ॥<br /><br />उलट तिने आम्हांस । पाडले उलटे खोट्यात ।<br />हरतऱ्हेने समजूत । काढून पाहिली तिची ॥<br /><br />सारे यत्न व्यर्थ गेले । उलट मन तिचे वळले ।<br />त्यांच्या बाजूने गेले । त्यांचे आयते फावले ॥<br /><br />म्हटले मी इतरांस । आता आपण करू बास ।<br />अपुल्या बोलण्याची आस । हिला नाही समजत ॥<br /><br />स्वानुभव खरा शिक्षक । तोच तो समीक्षक ।<br />तोच होईल रक्षक । आपण गुमान बसावे ॥<br /><br />तिला आम्ही म्हणले । जे मनास पटले ।<br />जे मनास रुचले । तेच फक्त कर तू ॥<br /><br />शेवटी तेच तुझे मैत्र । अमुच्यासकट सर्वत्र ।<br />आहेत तुझे सावत्र । साथ न सोड तयांची ॥<br /><br />उपहास माझ्या बोलण्यात । न आला तिच्या ध्यानात ।<br />होती अखंड धुंदीत । हात टेकले सर्वांनी ॥<br /><br />समजुत तिची काढण्याची । तसदी नाही घ्यायची ।<br />खुणगाठ बांधिली साची । ही आम्ही अखेर ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-81140232190134576372008-07-02T11:12:00.001+05:302008-08-02T01:14:55.707+05:30अध्याय पाच - वाटे हुरहुर....श्रोतेजनहो ऐका आता । माझ्या `ती'ची गाथा ।<br />मध्यावर आली कथा ।ह्या 'ती'पुराणाची ॥<br /><br />मैत्री अमुची होती छान । तिजसंगे मी विसरे भान ।<br />तिची संगत होती शान । मजसाठी जनहो ॥<br /><br />तो दिवस कठिण । मजसाठी अतोनात ।<br />ती होती अखंड व्यस्त । मुलांच्या गराड्यात ॥<br /><br />दिन तो मैत्रीचा । लाडका कॉलेजविश्वाचा ।<br />मजसाठी परीक्षेचा । काय सांगू तुम्हासी?<br /><br />मैत्री करण्या खरोखर । दोस्तहो तिच्याबरोबर ।<br />अश्याच दिसाची जरूर । हवी होती पोरांना ॥<br /><br />ती संधी सुंदर । चालून आली अखेर ।<br />पोरांनी तो घातला घेर । पक्का हिच्याभोवती ॥<br /><br />हिच्या सुंदर दिसण्यावर । फिदा होते सर्वजण ।<br />करीत असत वणवण । अखंड हिच्यामागे ॥<br /><br />ती वणवण त्यांची । थांबणार होती साची ।<br />होणार होती कायमची । मैत्री हिच्यासंगे ॥<br /><br />अंग हिचे सारे । नावांनी भरलेले ।<br />ज्याने त्याने लिहिलेले । नाव तिच्या हातावर ॥<br /><br />कोणी लिही हातावर । कोणी लिहि गालावर ।<br />कोणी लिहि तळव्यावर । सांगायची सोय ना ॥<br /><br />हात तिचा भरलेला । फ़्रेंडशीप बॅंड लाल, निळा ।<br />हाती तिच्या बांधलेला । कोणी कोणी राम जाणे ॥<br /><br />हिच्याबरोबर मी होतो जरी । अमुच्यामध्ये होती दुरी ।<br />जनता होती सारी । हिच्याभोवती अविरत ॥<br /><br />मीही थोडा विचार केला । आजच्या ह्या सुदिनाला ।<br />वाचा फोडावी प्रेमाला । अपुल्या एकदाची ॥<br /><br />धीर मात्र होईना । तिच्या समोर जाववेना ।<br />नजरही भिडवण्यास होईना । धाडस मला इवलेसे ॥<br /><br />छाती माझी तेधवा । उडू लागली धडधडा ।<br />वाटे जैसे हुडहुडा । भरला असे थंडीचा ॥<br /><br />दिवसाच्या शेवटी । मोकळी झाली अखेर ती ।<br />गोड हसून माझ्याशी । येऊन बसली ती ॥<br /><br />आता म्हटलं सांगाव । गुपित आपल्या मनींचं ।<br />परी साधं बोलण्याचं । तेही धारिष्ट्य होईना ॥<br /><br />म्हटल आता जाऊ दे । आपल्या प्रेमाचं राहू दे ।<br />मैत्रीच अपुली टिकू दे । तूर्तास म्हणजे मिळवलं ॥<br /><br />आजच्या ह्या दिवसात । अनेक आले मार्गात ।<br />कसेही करून हिच्या नजरेत । आपल्यास मोठे व्हायचे ॥<br /><br />असा विचार करून । तिला घरी सोडून ।<br />मनात थोडा हुरहुरून । अखेर घरी पोचलो ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-11501047564201652802008-06-27T10:02:00.001+05:302008-08-02T01:15:20.193+05:30अध्याय चार - ओळखनाव तिचे कळले । गावही ते समजले ।<br />परी मजला न उमगले । ओळख कैसी करावी ॥<br /><br />कधी वाटॆ जावे समोर । बोलून टाकावे खरोखर ।<br />की "तुझ्यापायी माझा मनमोर । नाचे ताथै ताथै" ॥<br /><br />कशास करावी घाई । का पाऊल टाकावे आततायी ।<br />ससा-कासवाच्या सशापायी । का करावे वर्तन? ॥<br /><br />ओळख तिच्याशी होताच । छंद तिचा समजताच ।<br />पोहोचू तिच्यापाशी साच । नि:संशय आपण ॥<br /><br />पर छंद तिचा कसा कळावा? । हाच प्रश्न का मज छळावा?<br />खूप ह्यावर विचार केला । बुद्धी काही चालेना ।<br /><br />सखीस तिच्या गाठावे का ?। खरेखुरे सांगावे का? ।<br />मदतीसाठी मागावे का? । हात तिचा ऐसे वाटे ।<br /><br />परी सखी तिची नेमकी । मैत्रिण निघाली खमकी ।<br />होणार गोची , हे चमकी । लगेच अमुच्या टाळक्यात ।<br /><br />तोही विचार बारगळला । वाटे उत्साहही गळला ।<br />परि दुसरा विचार उजळला । अमुच्या सुपिक टाळक्यात ॥<br /><br />नाव ठाऊक होते मला । गाठण्यास शीघ्र तिला ।<br />ऑर्कट आले मदतीला । आभार त्याचे मानतो मी ॥<br /><br />पाठवून १-२ स्क्रॅप । ओळख झाली आपोआप ।<br />मैत्रीचा केला पुढे हात । पाठवून विनंती मैत्रीची ॥<br /><br />जाणून घेतले तिचे छंद । मीही बाणवले तिचे छंद ।<br />अंगी जोपासले तिचे छंद । तिला खुष करण्यास ॥<br /><br />मग तिला हळूच । सांगितले वेळ बघून ।<br />आपण एका कॉलेजात । शिकतो हे अभिमानाने ॥<br /><br />ती फार खूष झाली । भेटण्यास आतुरली ।<br />म्हणे उद्या सकाळी । भेटू आपण कॉलेजा ॥<br /><br />देवघेव नंबराची । करूनिया संपर्काची ।<br />तयारी चढण्या पायरीची । केली पहिल्या प्रेमाच्या ॥<br /><br />दुस-या दिवशी प्रभाती । उत्साह तो माझ्याप्रती ।<br />रक्तामधून धावती । आतुरलो तिला भेटाया ॥<br /><br />इतक्यात माझ्या खिश्यात । मोबाईल भुरभुरला जोरात ।<br />'कॅटीनमध्ये भेटण्याप्रत । ये ' ऐसा निरोप तियेचा ॥<br /><br />पहिले लेक्चर बुडवोनी । कॅंटीनमध्ये बैसोनी ।<br />होती डोळा लावूनी । माझ्या येण्याकडे ॥<br /><br />तिला मी पाहिले । काहूर मनी उठले ।<br />तिला पाहून मी केले । स्मितहास्य समाधानी ॥<br /><br />सकाळच्या वातावरणी । होती ती ताजीतवानी ।<br />मोहक, सुंदर, सात्त्विक परिणी । ह्रदय माझे धडधडे ॥<br /><br />करून थोड्या गप्पा-टप्पा । सोबत घेऊन कॉफीच्या कपा ।<br />उघडू लागलॊ एकेक कप्पा । ती आपल्या मनाचा ॥<br /><br />पोरगी एकदम बडबडी । मनानी मोकळी ढाकळी ।<br />जणू कमळाची पाकळी । आहेच की ऐसे वाटे ॥<br /><br />मैत्री झाली निरंतर । संपुन गेले सगळे अंतर ।<br />खुष झाली मजवर । नियती ऐसे दिसते ॥<br /><br />आभार त्या देवाचे । ज्याने जोडले अमुचे ।<br />नाते घट्ट साचे । कॄतञता दाटली मनी ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-45201452925742900182008-06-26T20:31:00.001+05:302008-08-02T01:15:33.857+05:30अध्याय तीन - सांगे कवतिकतिच्यासाठी माझी । दिनचर्या मी बदलली साची ।<br />बात आहे प्रेमाची । शिथील मी कसे व्हावे ॥<br /><br />रोज तो गोड चेहरा । दिसू लागला परत मजला ।<br />भिडू लागती अमुच्या नजरा । जाता येता एकमेकां ॥<br /><br />नजर तिची बोलकी । नयन तिचे हरिणीपरी ।<br />फास टाकिती मजवरी । अडकून जाई मी त्यात ॥<br /><br />हास्य तियेचे मोहकु । तोच तियेचा कनकु ।<br />मन माझे लागे बहकु ।तिच्या एका स्मितापायी ॥<br /><br />ओठ तिचे सुंदर । वाटे जैसा की धनुर ।<br />हसताच ती, होई वार । अपार मम ह्र्दयी ॥<br /><br />पाठीवरी रुळे अपार । केशभार कुरळाकार ।<br />ठाव घेई आरपार । अपुल्या ह्रदयाचा ॥<br /><br />भाळी रूळे अनवट । एखादीच छान बट ।<br />झुळुकेवर उडे बेछुट । केशपुंज वलयाकारी ॥<br /><br />कांती तिची मोहमय । दुधावरली जणू साय ।<br />बेताल करी ह्रदय । ठेका चुकवी दिलाचा ॥<br /><br />वर्णन तिचे किती करू । शब्द लागती तोकडे पडू ।<br />अद्वितीय ऐसे पाखरू । वाहवा खुदाच्या प्रतिभेला ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-89449275614572181012008-06-26T19:19:00.001+05:302008-08-02T01:15:49.597+05:30अध्याय दोन - शोधननमस्कार पु्न्हा श्रोतेजन । स्वागत तुमचे मनोमन ।<br />ऐकावयासी कथन । आपल्या प्रेमाचे ॥<br /><br />श्रोते पहिल्या दिसानंतर । वाढत गेले अंतर ।<br />अमुच्यामधले निरंतर । काय बोलावे नियतीला ॥<br /><br />माझे शेवटचे वर्ष विद्यालयिन । कित्येक वाया गेले दिन ।<br />दिसलाही नाही मजला मीन । विद्यालयाच्या भवसागरी ॥<br /><br />विद्यालयात अनेक पाखरे । कैक सुंदर सुंदर चेहरे ।<br />परि हिच्यापरी न दुसरे । मुखकमल कोणाचे ॥<br /><br />पण तो सुंदर चेहरा । एक मास मज दिसला न जरा ।<br />मित्र सांगती "कशास झुरा?" । त्या एका चेहऱ्यापायी ॥<br /><br />माझे मनही मानेना । तिच्यावाचून रमेना ।<br />दुसरीकडेही बघेना । किमया हिच्या चेहऱयाची ॥<br /><br />शेवटी मी केला ’पण’ । हिलाच मिळवावी आपण ।<br />गड्यांस म्हटले "सर्व जण" । शोधा हिला मजसाठी" ॥<br /><br />गडी मैत्रीस जागले । अवघा गाव हिंडले ।<br />नाव,गाव शोधले । मजसाठी त्या पाखराचा ॥<br /><br />कुठे येते काय करते । किती वाजता घर गाठते ।<br />मित्र झाले कळविते । वेळापत्रक तियेचे ॥<br /><br />धन्य धन्य ते सांगाती । लावूनिया सर्व शक्ती ।<br />मदत केली मजप्रती । जागले अपुल्या दोस्तीला ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-49911596062067209962008-06-26T10:54:00.001+05:302008-08-02T01:16:04.007+05:30अध्याय एक - सुदिनतो दिवस होता खास । कोणी नव्हते आसपास ।<br />कसलीतरी लागली आस । माझिया मनाला॥<br /><br />खास दिवसाचे कारण । होतेही तसेच खास ।<br />तुम्ही ऐका श्रोते खास । कान देऊनि इथे ॥<br /><br />मी होतो कॉलेजात । शिकत तिसऱ्या वर्षात ।<br />माहिती तंत्रञानात । शिक्षण घेण्याकारणे ॥<br /><br />चार वर्षे कॉलेजाची । कोरडीच गेली साची ।<br />गरज वाटे पाण्याची । मला खरेच विबुधहो ॥<br /><br />दरसालाच्या आरंभा । वाटे कोणी येईल रंभा ।<br />सर्वांच्याधी प्रारंभा । बोलू आपण हिच्याशी ॥<br /><br />परी वेगळेच असे ललाटी । जिच्यासाठी आटाआटी ।<br />करावे तीच पॊरटी । घेई संगे सखयाला ॥<br /><br />सखा तिचा काळाकुट्ट । कपडे ज्याचे मळकट्ट ।<br />परी तोच वाटॆ बळकट्ट । त्या बिचाऱ्या बापडीला ॥<br /><br />अशी अमूची स्थिती । काहीही न आले हाती ।<br />यत्न केले अपरिमिती । काय बोलावे नशीबा ॥<br /><br />ऐसे बोलता माझे मन । काय सांगू सकल जन ।<br />केले कॉलेजात आगमन । एका सुंदर कन्येने ॥<br /><br />महत्त्व त्या क्षणाचे । मीच एक जाणतो साचे ।<br />करावया वर्णन तीचे । शब्द न मज सापडती ॥<br /><br />तरी आपण एके दिवशी । वर्णू त्या कामिनीशी ।<br />जिने नुकतेच षोडशी । केले आहे पदार्पण ॥<br /><br />निरोप अपुला घेतो अता । होण्याआधी ती बेपत्ता ।<br />शोधावयासी तिचा पत्ता । निघणे आहे भाग मला ॥ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-69096920835719180032008-06-25T11:00:00.000+05:302008-06-25T16:28:21.443+05:30असा उतरला माज<span style="font-weight:bold;">"आई-वडीलांचा आशीर्वाद"<br />"आई-वडलांचा आर्शीवाद"<br />"बाबांचा आर्शिवाद"</span><br /><span style="font-weight:bold;">"नैतिकता पाळा एड्स टाळा"</span>(रिक्षातलं वर्तन "नैतिकता टाळा एड्स पाळा")<br /><span style="font-weight:bold;">"मुलगी शिकली प्रगती झाली"</span>(प्रत्यक्षात मुलगी शिकली आगाऊ झाली)"<br /><span style="font-weight:bold;">"तीन माणसं"<br />"ठाणे तेथे काय उणे"</span>(सगळेच)<br /><br />ही आणि ह्यासारखी अनेक वाक्य रिक्षाच्या मागच्या बाजूला लिहिलेली असतात. वाटत, व्वा! रिक्षावाला एकदम सभ्य आणि समंजस दिसतोय. म्हणून रिक्षात बसायला जातो तर आत भैय्या मग्रुरी दाखवत असतो. आणि आपल्या तळपायाची आग, चामड्याची चप्पल न वितळवता मस्तकात जाते. असं वाटतं साल्याच बकोट धरावं आणि बाहेर ओढून बेदम मारावं. सगळा माज गलितगात्र झाला पाहिजे xxxचा!! आपले मराठी रिक्षाचालक तंगड्या वर करून घरात लोळत पडतात आणि ह्या टिटव्यांना इथे भाड्याने चालवायला देतात. हे साले बिहारी रिक्षाच्या रांगेत उभे राहतात आणि आपल्याला जिथे जायचं असतं तिथे जायला नकार देतात.<br /><br />एकदा मी आणि माझा एक मित्र ठाण्यात होतो आणि आम्हाला चेकनाक्याला जायचं होतं. रिक्षात बसलो आणि भैय्याला सांगितलं चेकनाका म्हणून. साला नाही म्हणाला.<br /><br />भैय्या-नही, चेकनाका हम नही आऍंगे<br /><br />मित्र-क्यु?<br /><br />भैय्या-मुझे दुसरी जगा जाना है<br /><br />मी-ठिक है, हम भी वही आऍंगे<br /><br />भैय्या-देखो भैय्या नादानी ना करो. दुसरी रिक्षा पकडो<br /><br />मी-साले, भैय्या तू है , मै नही! हम भी नही उतरेंगे, जिधर लेके जाना है उधर लेके चलो<br /><br />मित्र-पुलिस इस्टेसन, इस्टेसन (खास भैय्या इस्टाईलमध्ये),तेरा रंडी बजार, या फिर चेकनाका....<br /><br />भैय्या-भाई आप क्यु परेसान कर रहें है गरीब को?(आवाजात जरा मार्दव आला साल्याच्या)<br /><br />मी-कौन साला तेरेको परेसान कर रहा है? सांतक्रुझमें होता अभी तो MNS वालोंसे पिटाई होती तेरी...<br /><br />आम्ही आमच्या गप्पा सुरू केल्या, त्या शिंधडीच्याकडे लक्षच दिलं नाही. ठरवलंच होतं, काही झालं तरी रिक्षा आपल्याला हवी तिथे नेल्याशिवाय खाली उतरायचंच नाही.<br /><br />भैय्या-(ओरडून)आपका क्या नाटक......<br /><br />मी-(त्याला मध्येच तोडत आणि त्याच्याहून जोरात ओरडत) ए टिटवे, आवाज नीचे कर, और जहॉं हम बता रहे है वहॉं सीधेसे चल, हम उतरनेवाले नही है<br /><br />पाठचे रिक्षावाले एकएक करून , गि-हाईक मिळेल तसे निघून जायला लागले. त्यामुळे ह्याचा जीव खाली-वर झाला. की आपण पहिले असून अजून इथेच आणि आपल्या मागचे निघून पण गेले. मागचे २-३ रिक्षावाले येऊन विचारून पण गेले काय झालं म्हणून. तुम्ही तुमचं काम करा , म्हणून त्यांनाही आम्ही मार्गी लावलं.<br />शेवटी वैतागून भैय्या रिक्षात बसला. "साला क्या बोलेगा अभी?" म्हणत रिक्षा चेकनाक्याला आणून सोडली.<br /><br />भैय्या-आपके जैसा भाडा कभी मिला नही आजतक<br /><br />मित्र-चुत्ये लाईनमें खडा होके ना नही बोलने का! हम फोकटमें नही बैठते तेरी गाडीमें। पैसा देते है । जिधर बोलते है उधर आनाही पडेगा ।<br /><br />मान हलवत निघून गेला भैय्या. एका भैय्या रिक्षावाल्याची जिरवल्याचं समाधान मिळालं. <br /><br />एकदा रात्री बारा वाजता ऑफिसमधून घरी येत होतो. मुलुंड(प) चेकनाक्यावर बस थांबली. तिथून पूर्वेला माझं घर असल्याने मला रिक्षा करावी लागते. रात्री फक्त भैय्येच रिक्षा चालवतात. मराठी माणूस बायकोला कुशीत घेऊन झोपलेला असतो त्याच्या घरी.<br /><br />मी-ईस्ट जानेका है<br /><br />भैय्या-नही आएगा<br /><br />ज्या मग्रुरीने तो बोलला माझा टाळकंच फिरलं. माझ्याबरोबर अजून एक मित्र पण होता.<br /><br />मी-तो गाडी इधर क्या मॉं xxxxके लिये खडी की है क्या?<br /><br />भडकला तो. अंगावर धावून आला माझ्या. माझी कॉलर पकडून शिव्या द्यायला लागला. माझ्या कानफडात लगावली त्याने एक. मीही ह्या झालेल्या हल्ल्यातून सावरलो. त्याच्या पोटात एक गुच्चा दिला. आणि गुटघ्याने त्याच्या 'सामानावर'च लाथ मारली. त्यासरशी त्याच्या अंगातला जोरंच गेला. माझी कॉलर सोडून खाली बसला. असह्य वेदना झाल्या असतील त्याला. माझ्या मित्राने मला सोडवायचे कष्ट घेतले नाहीत. स्टॅंडच्या बाजूला एक divider चा दगड होता. तो त्याने उचलला आणि रिक्षावर टाकला. काच फुटली आणि दगड धाडक्न खाली पडला रिक्षात. काय नुकसान झालं असेल त्याचं माहिती नाही. बाजुला थोडे लोक जमा झाले. इतर रिक्षावाले बघत होते रांगेतले.<br /><br />मी-अब चला जितनी चलानी है उतनी रिक्षा! <br /><br />पाठच्या रिक्षावाल्याला म्हणलं.<br /><br />मी- देखता क्या है? ईस्टमें चल..<br /><br />तोही भैय्याच<br /><br />तो-बैटीयें ना साहब....<br /><br />त्याने मीटर टाकलं. पहिलं मीटर कधी पडतं त्यावरून मला आता समजायला लागलंय मीटर fast आहे की normal आहे. ह्याचं मीटर फास्ट होतं. मी काहीच बोललो नाही. घराच्या इथे आलो.<br /><br />मी-मीटर फास्ट है तेरा..<br /><br />भैय्या-हॉं है ना साब.<br /><br />मी- क्यु?<br /><br />भैय्या-वो सिटीके लिये है, लोकल के लिये नही<br /><br />मी-लेकीन मै अभी लोकलमें हु. मेरा नुकसान हुआ उसका क्या? भले वो २-३ रु. का है, मै उससे बंगला नही बांधनेवाला. फिर भी क्यु?<br /><br />भैय्या-(लाचार हसणं, आणि भीती वाटुन)आ..आपसे किधर ले रहें है हम ज्यादा? <br /><br />साल्याने गुमान जेवढे पैसे होतात तेवढेच घेतले. आणि निघून गेला. ह्या हरामखोरांचा माज उतरवण्याची वेळ आली आहे..ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-76590063081385031962008-06-20T08:47:00.000+05:302008-12-13T19:06:20.540+05:30म्यॅंव.....<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/SF85Rya_xYI/AAAAAAAAAJI/W-Iwx-0COls/s1600-h/Pic496.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/SF85Rya_xYI/AAAAAAAAAJI/W-Iwx-0COls/s320/Pic496.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5214949871273887106" /></a><br />पु. ल. देशपांड्यांनी, प्राण्यांमध्ये सर्वाधिक उच्छाद जर कोणत्या प्राण्याचा असेल तर तो प्राणी म्हणजे मांजर, ह्या त्यांच्या पाळीव प्राणीमधल्या ह्या मताशी थोड्या प्रमाणात सहमत आहे. कारण १९९८ पासून आज आमच्या घरात मांजरांच्या तीन पिढ्या नांदून गेल्या आहेत. तिसऱ्या पिढीतला शेवटचा पुरावा शेवटची काही वर्षं जगत आहे.<br /><br />मी शाळेत होतो तेव्हा. उन्हाळ्याची सुट्टी होती. सकाळी ३-४ तास खाली खेळून घरी आलो, तर दारात एका मांजरीने तिची १-२ महिन्यांची पिल्लं आणुन ठेवली होती. आणि मी आलो तेव्हा ती बया स्वतःच अंग चाटण्यात मश्गुल होती , बया म्हणजे मांजर. तिची पिल्लं एकमेकांशी खेळत होती, मस्ती करत होती, एकमेकांना खोटं खोटं चावत होती, त्यातलं एखाद पिल्लू मध्येच काहीतरी पकडल्याचा हावभाव करायचं... अश्या एक आणि अनेक प्रकारे त्यांच्या टिवल्याबावल्या चालल्या होत्या. अर्थातच मला त्या पिल्लांनी आकॄष्ट केलं. तिथेच त्यांच्याशी खेळत बसायलाही मी तयार होतो. पण माझ्या पोटातही भुकेने खेळ मांडलेला होता. म्हणून मी घरात आलो.<br /><br />जेवतानाही मनाला शांतपणा कुठे? कधी एकदा जेवण संपवून त्यान पिलांशी खेळतोय अस झालं होतं. त्याप्रमाणे जेवून केरसुणीची एक बारीक काडी घेतली आणि सेफ्टी डोअर आणि उंबरठा ह्यांच्यातल्या छोट्याश्या फटीतुन मी ती काडी थोडी बाहेर काढुन हलवायला लागलो. पिल्लं झोपलेली होती. पण जमिनीवर कसलातरी आवाज येतोय हे बघुन त्यांनी कान टवकारले आणि आवाजाच्या दिशेने बघू लागली. जशी काडी हलेल तितक्याच चपळाईने त्यांच्या माना हलत होत्या, हे तेव्हा मला फार मजेशी वाटलं. झोपेमुळे ती जरा आळसावलेली होती. थोड्यावेळाने मीही काडी हलवायची थांबवली. तसं त्यातल एक पिल्लू उठलं. नाक उडवत काठीपासून सावधपणे थोड्या दूर उभं राहिलं आणि हळुच एक डावली मारून पहिली. त्याने जशी डावली मारली तशी मीही नकळत काठी मागे घेतली आणि त्यान उंच आणि 'reverse' उडी मारली. आणि परत ते सावरलं आणि सावध झालं. मग त्याच्याबरोबरची अजून दोन पिल्लंही उठली. आणि मग एकाच काडीच्या मागे तिन्ही पिल्लं पळायला लागली. आळस कुठच्या कुठे पळाला त्यांचा. पिल्लांमधला हा खेळकरपणा आणि चळवळेपणा प्रचंड भावतो.<br /><br />हळुहळु रोज त्यांच्याशी खेळणं हा एक दिनचर्येतला भागच झाला. मग खेळून खेळून दमली असतील बिचारी दूध देऊ त्यांना. असं म्हणत म्हणत तोही एक दिनचर्येतलाच भाग झाला. आणि अश्याच एके दिवशी त्यांचा गृहप्रवेशही झाला. मग त्यांच ह्याखोलीतुन त्याखोलीत पळणं. एक टि-पॉय बसून आणि दुसरं टि-पॉयच्या खाली बसून एकमेकांना डावल्या मारणं, त्यात लपाछुपी खेळणं, पकडापकडी खेळणं असे अनेकविध खेळ ती पिल्लं खेळत असत. मग जरा मोठी झाल्यावर त्यांच्या आईचं म्हणजे मन्नम्माचं पिल्लांवर फिसरकारणं आणि स्वावलंबनासाठी कठोर होऊन त्यांना आपल्यापासून दूर ठेवणं असले प्रकार सुरू झाले. आणि आम्हाला आईने अशी दूर केलेली पिल्लं अजुनच केविलवाणी वाटली. त्यात त्यांच ओरडणं अजुनच केविलवाणं. मग पायात घूटमळणं, आपल्या पायांवर अंग झोकून देणं, आणि दूधासाठी आपल्याला लाडीगोडी लावणं, ह्या सगळ्याचा अखेरीस लळा लागू लागला. आणि ती मांजरं आमच्या घरातला एक भागच झाला. अजून काही दिवसांनी त्या पिल्लांची मोठ्या मांजरींमध्ये गणती व्हायला लागली. मोठी झाल्यावर त्यांच एकमेकांवरचं प्रेम गळून पडलं आणि ती एकमेकांशी भांडायला लागली आणि मग आमच्या घरातून त्यांची हकालपट्टी झाली.<br /><br />त्यानंतर मन्नम्माने आणखी एकदा ३ पिल्लांना जन्म दिला, आणि परत आमच्या इथे आणून ठेवलं. आणि परत तोच खेळ सुरू झाला. त्यांच्यातलं एक पिल्लू अतिशय अशक्त होतं आणि पुढच्या ४-५ दिवसातच त्याची ह्या मोहमायेतून सुटका झाली. आणि ही २ पिल्ल परत आमच्या घरात आली. अतिशय गुटगुटीत अशी ती पिल्लं दुडूदुडू धावायची तेव्हा मजा वाटायची. काही दिवसांनी ह्यातल्याच एका पिल्लाला म्हणजेच मांजरीला २ पिल्लं झाली. आणि आधीच्या पिढीतल्या मांजरींना झालेली पिल्ल, अशी मिळून एकूण १८ मांजरं आमच्या सोसायटीत आनंदाने नांदू लागली. आणि त्यांचा सुळसुळाट सुरू झाला. कोणत्याही विंगच्या कोणत्याही मजल्यावर, कोणाच्या घरासमोर घाण करून ठेवणं वगैरे प्रकार सुरू झाली आणि ती मांजरं उच्छाद म्हणून ओळखली जाऊ लागली. कोणीतरी हरामखोर त्यांना खाण्यातून विष देऊ लागलं आणि त्यात ९ मांजरांची मोहमायेतून सुटका झाली. आमच्या घरात २ मांजरी अखंड राहू लागल्या. त्यांना घरातून बाहेर जायची परमिशन मिळाली नव्हती माझ्या आई आणि बहिणीकडून. सोसायटीतल्या आणखी एका मांजरीला झालेली पिल्लं आमच्या खालच्या आजींच्या घराबाहेर खेळत होती. २ महिन्यांच्या एका पिल्लाला त्या आजीनी एकदा काठी मारली आणि त्याचा पाय मोडलां. त्याच्याबरोबरची पिल्लं खेळायची नी हे नुसतं बघत बसायचं. मग माझ्या बहिणीनी आणि शेजारच्या मुलीनी त्या पिल्लाला डॉक्टरांकडे नेलं. आणि पायाला प्लास्टर बांधून आणलं. ऍनिमल वेल्फेअर मधून एक नोटिस लिहून आणली आणि सोसायटीच्या हापिसात सादर केली. आणि प्राण्यांना मारल्यानंतर होणाऱ्या परिणामांची माहिती मिळताच सगळ्यांचे धाबे दणाणले. मग ते मोडक्या पायाचं पिल्लूही आमच्याच घरात राहू लागलं. दरम्यान कित्येक मांजरींना त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे मच्छीबाजारात सोडलं. <br /><br />पण आमच्या घरातला उच्छाद तसाच होता. पिल्ल जरा मोठी होऊदेत. मग पावसाळा संपल्यावर सोडू बाहेर. ती जरा मोठी झाल्यावर भांडायला लागतील, तेव्हा सोडू बाहेर अशी निरनिराळ्या कारणांनी ती ८ वर्ष घरातच राहिली. आणि तो प्राणी खरंच जितका लळा लावतो तेवढाच आपला छळही करतो. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी कुठले कुठले कोपरे शोधणे आणि घाण करणे, वगैरे अनेक प्रकारे आमचा छळ झाला आमचा त्यांच्याकडून. आमच्या गॅलरीत लावलेल्या दुर्वा गणपतीपेक्षा मांजरीच जास्त खातात. नखं साफ़ करण्यासाठी ठिकठिकाणी ओरबाडून आमचे सोफे खराब केले त्या कारट्यांनी.<br /><br />असो, १ मांजर २ वर्षांपूर्वी ढगात गेली. ढगासारखीच पांढरी शुभ्र होती ती. मांजरींच मरण जवळ येत तेव्हा त्या घर सोडून निघून जातात. त्या मरताना कोणाला दिसत नाहीत. पण मी मांजर आचके देत मरताना पाहिलंय. अतिशय वाईट वाटलं तेव्हा. दुसऱ्या मांजरीला आम्ही भल्या पहाटे तिच्या आवडत्या ठिकाणी सोडलं. अजून एक अतिशय वयस्कर मांजर आमच्या घरात आहे. जेवढा तिचा लळा लागला तेवढाच मांजरींचा कंटाळाही आला आता. तरीही भविष्यात कुठेही मांजर दिसली की आमच्याकडच्या मांजरी आठवल्याशिवाय राहाणार नाही.ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-529642454980084781.post-70274254651405587772008-06-16T19:55:00.000+05:302009-09-04T19:57:50.222+05:30बुड्बुडअजय<br />रिसबुड<br />जाड्या<br />पोटॅशियम<br />बुड्बुड<br />आणि ह्याखाली शिव्या. हे काय असेल सगळ? ही आहे आमच्या कट्ट्यावरच्या , माझा चांगला मित्र अजय रिसबुड ह्याची नामावली. साधारण ५’६” उंची असलेला, विटी दांडू मधल्या विटीच्या आकाराची शरीरयष्टी असलेला अजय, "चंद्र वाढतो कलेकलेने, अजय वाढतो किलोकिलोने" ह्या उक्तीला जागून आहे. कोणी विचारलं ह्या ओळीचा अर्थ काय? तर उत्तर ठोकून द्यायचं अजय रिसबुड!! त्याच्या आकाराच्या तिप्पट % , उत्तर बरोबरच येणार. आणि त्याच्या कष्टाने कमावलेल्या शरीरयष्टीचा त्याला अभिमानही आहे. आणि तो माझा मित्र आहे ह्याचा मलाही अभिमान आहे. एखादा तरी मित्र असा असायलाच हवा.<br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/SFcpLzizKVI/AAAAAAAAAIo/3tYM89mdOh0/s1600-h/22122007048.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://4.bp.blogspot.com/_ya-oxfZ2E6w/SFcpLzizKVI/AAAAAAAAAIo/3tYM89mdOh0/s320/22122007048.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5212680376496105810" /></a><br /><br /><br />तसा तो माझ्यापेक्षा ५ वर्ष मोठा आहे, आमची मैत्री ३ वर्षांपूर्वी झाली. त्याचं कारण म्हणजे आम्हाला असलेला गाण्याचा छंद. मला गाण्याचा छंद आहे, पण मी गाणं शिकलेलो नाही. पू्र्वपुण्याईच्या जोरावर, मला स्वरञान लाभलं. त्याआधारे मी गातो. मी पेटी शिकलो, त्यामुळे नोकरी लागण्यापूर्वी रोज सकाळी अजयकडे पेटी बडवायला जातसे. तो त्याचा शास्त्रीय संगीताचा रियाज करायचा, नी मी त्याला पेटीवर साथ करायचो. केवळ त्याच्यामुळे मला कित्येक रागांची माहिती मिळाली. कारण मी पेटी शिकलो, माझ्या गुरुंनी मला माझा हात तयार करुन दिला. त्यांनी मला सांगितलं होतं की तुला शास्त्रीय संगीताच ञान साथ केल्यावर जसं मिळेल तसं कधीच मिळणार नाही. आणि त्यांच्या ह्या वाक्याची अनुभूती मला अजयमुळे मिळाली. त्याच्या गाण्याची खासियत म्हणजे त्याच्या आवाजातला जोर, स्थैर्य, सूराचं जबरदस्त ञान ह्या्मुळे त्यातून ठासून भरलेला आत्मविश्वास दिसतो. त्याच्या आवाजाची खासियत, म्हणजे तो पांढरी तीन मध्ये शास्त्रीय गातो, आणि सगळ्या सप्तकांमध्ये तेवढाच जोरकस आवाज त्याच्या नरड्यातून निघतो. आवाज कितीही बसलेला असला, तरीही तो सहज गाऊ शकतो. ह्याला दैवी देणगी म्हणतात. <br /><br />ह्या रसायनाचा अजुन एक गुणधर्म म्हणजे खवैय्येगिरी! हा माणूस प्रचंड खातो. खायला कधीही लाजत नाही. समोर काहीही आणून ठेवा, हा खातो. मला वांग, कार्ल, कित्येक पालेभाज्या, मटकी , डाळिंब्याची उसळ, अश्या कितीतरी आवडी-निवडी आहेत. पोटॅशियमचं तसलं काही नाही. काही द्या, आम्ही खाणार. माझ्याबरोबर मसाल-पाव खाल्ल्यावर दुसरा मित्र भेटला आणि म्हणला की, ’चल अजय चायनीज खाऊ’ तर शेठ लगेच तयार होतील. आणि त्याला सांगणार नाही कि अरे आत्ताच मी मसाला पाव खाऊन आलोय. त्या मित्राला वाटेल हा रिकाम्या पोटी खातोय सगळं! एकदा ह्याची आजी बाहेर होती २-३ दिवस. तेव्हा तिच्या घरी ह्याने आम्हाला बोलावलं. आम्ही घरी २.५ किलो बटाटा वडे आणले ४ जणांसाठी. रात्री ९.३०-१० च्या सुमारास आम्ही ते आणले, थोडे खाऊन आमचं पोट भरलं. त्यानंतर २-३ तास रात्री गप्पा मारून सांडलो. आणि थोड्यावेळाने निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी मी उठलो, तर मला गोणीच्या आकाराचं काहीतरी स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर दिसलं. आणि मी झोपेत होतो, म्हण्लं गोणी कशी काय हलत्ये? मगाच पासून घरी होतो तेव्हा दिसली नाही,आत्ता कशी काय आली? म्हणून मी मधला दिवा लावला, तर बुड्बुड उरलेले पाच वडे खात होता. मी हरलॊ. पहाटे ३.३० वाजता हा मनुष्य वडे खात होता!! म्हणे,‘अरे फार भूक लागली मला’. म्हणलं साहेब तुम्ही धन्य आहात!!!<br /><br />ह्याच्यातला अजुन एक गुण मला आवडतो गबाळेपणा. जो गूण माझ्यातही आहे. कोणत्याही पॅंटवर कोणताही सदरा घालणे, जीन्सवर स्लीपर्स घालणे. आम्ही जे कपडे घालू तीच फॅशन आणि बाकीचं सगळं म्हणजे मूर्खपणा, असा आमचा समज आहे. एकदा तर ह्याने वेंधळेपणाची परिसीमा गाठली होती. रात्री जेवल्यावर बाहेर पडलो सगळे. आणि एका नाक्यावर गप्पा छाटत उभे होतो. ह्याला त्याच्या बायकोचा फोन आला. आणि हा तिच्याशी बोलता बोलता, आमच्यापासून वेगळा झाला, आणि येर-झारा घालत बोलण सु्रु होतं. आमचं आधी कोणाचंच लक्ष नव्हतं, कारण आम्ही आमच्या गप्पांमध्ये दंग होतो. थोड्यावेळाने बघतो तर ह्याच्या पाठीमागे काहीतरी लोंबत होतं. नीट बघतो तर साहेबांनी अर्धी-चड्डी उलटी घातली होती. उलटी म्हणजे नाड्या मागे. आणि चड्डीला elastic असल्यामूळे ह्याने वेण्यांसारख्या नाड्या सोडल्या होत्या बाहेर. बेफाम हसलो. हसता हसता पडायचं बाकी राहिलं होतं.<br /><br />अजून एक फाजिल किस्सा आहे. पण तो ज्या क्रियेबद्दल आहे ती क्रिया पुर्णपणे नैसर्गिक आणि अत्यावश्यक आहे. ती म्हणजे शरीरातून वायु सोडणे!! बुड्बुड आणि अमोद चितळे ह्याबाबतीत आचरटपणाचा कळस गाठतात. दोघांमध्ये पादण्याची स्पर्धा लागते. आणि जो जास्तवेळा वायु सोडेल तो जिंकला. त्याचे गुणही असतात. त्यामुळे अजयने अमोदवर २०/७ ने मात केली वगैरे असा धावता गुण-फलकही असतो. आणि वास आला की बाद.........एवढा आचरटपणा अजुन कुठे चालत असेल असं वाटत नाही.<br /><br />अजयची चालण्याची पण एक ढब आहे. चालताना त्याचं मांस सगळ्या बाजुंनी पॅंटवर वर्चस्व गाजवत असतं. त्यामुळे मध्येच हा एकाबाजुने पोट आत खोचून पॅंट वर घेतो, मग दुसऱया बाजुने मांस आत खोचून पॅंट वर घेतो. हाताची बोटं सतत जादू करत असल्यासारखी हवेत फिरत असतात. त्याच्याशी बोलणं म्हणजे जरा सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. कारण हा मध्येच विषय बदलतो. म्हणजे एका विषयावर आपण बोलत असतो आणि हा मध्येच असंबद्ध वाक्य टाकतो, वेगळ्याच विषयावर. त्या वाक्याआधीची त्या विषयावरची बरीच वाक्य त्याने मनातल्या मनात बोलून झालेली असतात. पण समोरचा माणूस मनकवडा नाही हे बहुदा तो विसरतो. खुप चंचल आहे ह्याबाबतीत. चिडतो फटकन. शांतही होतो, पण मनावरचा ताबा लवकर सुटतो. गाण्यातले राग लवकर येतात म्हणजे जगात बाकीचे जेवढ्या प्रकारचे राग आहेत तेही लवकर यायला हवेत अशी त्याची फल्तु अपेक्षा असावी.<br /><br />हे सद्गुण-दुर्गुणभरीत बुड्बुड्चरित्र मी इथे लिहिलंय हे जर त्याला समजलं, तर माझ काही खरं नाही. पण तरीही अजय जसा आहे तसाच त्याने राहावं. उगाच टापटिप अजय, खाताना लाजणारा अजय माझ्या डोळ्यांना बघवणार नाही.ओंकार घैसासhttp://www.blogger.com/profile/11302443318823903398noreply@blogger.com0